शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

दौंड, इंदापूर, बारामतीला आज मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:54 IST

पालिकेमुळे रखडले शेतीचे आवर्तन; शेतकऱ्यांच्या नजरा कालव्याकडे

पुणे : कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून अद्याप कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. पालिकेने रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटण्याची दुर्घटना घडल्यामुळे जलसंपदा विभाग व पालिका प्रशासनातर्फे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दुरूस्तीची कामे संस्थ गतीने सुरू असल्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सोडता आले नाही. कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, रविवारपासून पाणी सोडण्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून जनता वसाहत येथे कालवा फुटल्याच्या बाजूला राम मंदिराजवळ संरक्षक भिंत उभारण्याचे काम शनिवारपर्यंत सुरू होते. भिंत बांधून झाली असली तरी कालव्यामध्ये उतरवण्यात आलेली यंंत्रसामुग्री, इतर साहित्य बाहेर काढण्याचे शनिवारपर्यंत सुरू होते. रात्री उशीरापर्यंत किंवा सकाळी हे साहित्य काढून रविवारी दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे,असे खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार यांनी सांगितले.शेलार म्हणाले,पाटबंधारे विभागाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे.मात्र,पालिकेकडून अजूनही दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत.पालिकेकडून दुरूस्तीच्या कामासाठी कालव्यात टाकण्यात आलेली माती अद्याप काढण्यात आली नाही.पालिकेने सकाळी लवकर हे काम पूर्ण केल्यास दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडता येईल.खडकवासल्यातून प्रथमत: ६०० ते ७०० क्यूसेक पाणी सोडण्यात येईल.पाणी सोडल्यानंतर कालव्याला काही धोका आहे का? याची पहाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांकडून केली जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्याने ३०० क्यूसेकने पाणी वाढविले जाईल.कालव्यातून १,३०० क्यूसेकपर्यंत पाणी वाढविले जाईल.महिनाभर कालवा दुरूस्तीचे काम बंद सुरू असल्यामुळे शेतक-यांचे खरीपाचे आवर्तन बंद करावे लागले.मात्र,रब्बी हंगामासाठी 15 आॅक्टोबरपासून पाणी सोडले जाणार होते.परंतु,दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने दौंड,इंदापूर,बारामतीसाठी पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत.अखेर रविवारी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :mula muthaमुळा मुठा