शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

दौंड, इंदापूर, बारामतीला आज मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:54 IST

पालिकेमुळे रखडले शेतीचे आवर्तन; शेतकऱ्यांच्या नजरा कालव्याकडे

पुणे : कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून अद्याप कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. पालिकेने रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटण्याची दुर्घटना घडल्यामुळे जलसंपदा विभाग व पालिका प्रशासनातर्फे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दुरूस्तीची कामे संस्थ गतीने सुरू असल्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सोडता आले नाही. कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, रविवारपासून पाणी सोडण्याचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून जनता वसाहत येथे कालवा फुटल्याच्या बाजूला राम मंदिराजवळ संरक्षक भिंत उभारण्याचे काम शनिवारपर्यंत सुरू होते. भिंत बांधून झाली असली तरी कालव्यामध्ये उतरवण्यात आलेली यंंत्रसामुग्री, इतर साहित्य बाहेर काढण्याचे शनिवारपर्यंत सुरू होते. रात्री उशीरापर्यंत किंवा सकाळी हे साहित्य काढून रविवारी दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे,असे खडकवासला धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार यांनी सांगितले.शेलार म्हणाले,पाटबंधारे विभागाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे.मात्र,पालिकेकडून अजूनही दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नाहीत.पालिकेकडून दुरूस्तीच्या कामासाठी कालव्यात टाकण्यात आलेली माती अद्याप काढण्यात आली नाही.पालिकेने सकाळी लवकर हे काम पूर्ण केल्यास दुपारनंतर कालव्यातून पाणी सोडता येईल.खडकवासल्यातून प्रथमत: ६०० ते ७०० क्यूसेक पाणी सोडण्यात येईल.पाणी सोडल्यानंतर कालव्याला काही धोका आहे का? याची पहाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांकडून केली जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्याने ३०० क्यूसेकने पाणी वाढविले जाईल.कालव्यातून १,३०० क्यूसेकपर्यंत पाणी वाढविले जाईल.महिनाभर कालवा दुरूस्तीचे काम बंद सुरू असल्यामुळे शेतक-यांचे खरीपाचे आवर्तन बंद करावे लागले.मात्र,रब्बी हंगामासाठी 15 आॅक्टोबरपासून पाणी सोडले जाणार होते.परंतु,दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने दौंड,इंदापूर,बारामतीसाठी पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत.अखेर रविवारी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :mula muthaमुळा मुठा