शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महाविद्यालय सुरू करण्यास ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये ...

पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये व वसतिगृहांमधील क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेत आहे. या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

राज्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाविद्यालयीन तरूणाई अस्वस्थ आहे. उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही उदासिन आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुध्दा ‘तारीख पे तारीख’ देत आहेत. रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी महाविद्यालय व वसतीगृहातील क्वारंटाईन सेंटरबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.त्यामुळे उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस अभ्यास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू केले होते. मात्र, शाळांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून या शाळा सुरू केल्या. पुणे शहरात सुमारे दीड महिन्यांपूर्वी सर्व क्वारंटाईन सेंटर बंद केले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेवून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय २० जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले होते. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी बंद झालेल्या क्वारंटाईन सेंटरचा अभ्यास करण्यास उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस घेणार ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

---

महाविद्यालये सुरू करण्यासाठी किती टक्के विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांना बोलवावे याबाबतची नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घेऊ.

- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री