शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाविद्यालय सुरू करण्यास ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये ...

पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये व वसतिगृहांमधील क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेत आहे. या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

राज्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाविद्यालयीन तरूणाई अस्वस्थ आहे. उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही उदासिन आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुध्दा ‘तारीख पे तारीख’ देत आहेत. रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी महाविद्यालय व वसतीगृहातील क्वारंटाईन सेंटरबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.त्यामुळे उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस अभ्यास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू केले होते. मात्र, शाळांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून या शाळा सुरू केल्या. पुणे शहरात सुमारे दीड महिन्यांपूर्वी सर्व क्वारंटाईन सेंटर बंद केले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेवून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय २० जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले होते. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी बंद झालेल्या क्वारंटाईन सेंटरचा अभ्यास करण्यास उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस घेणार ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

---

महाविद्यालये सुरू करण्यासाठी किती टक्के विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांना बोलवावे याबाबतची नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घेऊ.

- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री