शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

जन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: April 17, 2015 23:21 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्याने आज आणखी एका बालकाचा जीव घेतला. २00१ नंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात २४ जणांना ठार केले

खोडद : जुन्नर तालुक्यात बिबट्याने आज आणखी एका बालकाचा जीव घेतला. २00१ नंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात २४ जणांना ठार केले असून ८३ व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. यात सर्वाधिक जुन्नरमधीलच आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तालुक्यात दहशत पसरली आहे. तालुक्यातील ओझर, शिरोली, पिंपळवंडी, ठिकेकरवाडी, मंगरूळ, पारगाव, येडगाव, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद, रोहकडी, ओतूर, शिरोली, सुलतानपूर, बोरी, साळवाडी, निमगाव सावा आदी गावांमध्ये बिबट्यांचा मोठा वावर आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जनावरे व माणसांवर त्यांनी हल्ले केले आहेत. जुन्नर तालुक्यात ९ हजार हेक्टर सलग क्षेत्रामध्ये उसाचे पीक घेतले जाते. जसजशी उसाची वाढ होत जाते, त्यानंतर शेतकऱ्यांना अंतर्गत मशागत करणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना ऊस म्हणजे एक प्रकारे सुरक्षाकवच मिळते. या ठिकाणी असणारे पाणी, गारवा, लपण्यासाठी सुरक्षित जागा तसेच, शेळ्या, मेंढ्या, वासरे, ससे, कुत्रे यांसारख्या प्राण्यांना सहजपणे मिळणारे खाद्य यामुळे येथे बिबटे वास्तव्य करीत आहेत.नोव्हेंबर ते मार्च हा ऊसतोड हंगाम असतो. ऊस तुटून गेल्याने बिबट्यांची लपण कमी-कमी झाल्याने पर्यायाने पाणी व भक्ष्याच्या शोधात भटकंती करत ते मानवी वस्त्यांकडे येऊन हल्ले करतात.जुन्नर वनविभागाकडे बिबटे पकडण्याचे एकूण ४० पिंजरे असून, यापैकी २४ ते २५ सुस्थितीत आहेत. उर्वरित नादुरुस्त आहेत. प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे प्रत्येकी ५ ते ६ पिंजरे उपलब्ध आहेत. (वार्ताहर)४जुन्नर तालुक्यात सन १९९४ ते २००२ मध्ये बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. ४२०१० ते १५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात ४ ठार २७ जखमी झाले आहेत. त्यात सन २०१०-११ मध्ये ३ नागरिक ठार, तर २० जखमी झाले होते. ४सन २०१४-१५ मध्ये २ ठार, ४ जखमी झाले होते. १०९० जनावरे मारली गेली आहेत.४मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना सन २००२ पासून २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती. सन २०१४ पासून नुकसान भरपाई जवळपास तिपटी ने वाढविण्यात आलेली आहे.४मृत व्यक्तींच्या वारसांना २३,१३,९०० रुपये तर जखमी व्यक्तींच्या वारसांना ६,५९, ००८ रुपये देण्यात आलेले आहेत . ४पाळीव प्राण्यांच्या भरपाई पोटी वनविभागाकडून ६० लक्ष ६८ हजार ६१९ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.