शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भोर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:17 IST

भोर तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.

भोर - तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.तालुक्यातील डोंगर उतारावर असलेली घरे, वाड्या-वस्त्यांना धोका होऊ शकतो. त्यात खालची धानवली, डेहेणे, सोनारवाडी (पांगारी) जांभुळवाडी (कोर्ले) या डोंगरात असणाऱ्या गावात दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करून सदरची गावे धोकादायक म्हणून जाहीर केली असून, या गावात उपाय सुचविण्यासाठी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. तसा अहवाल प्रशासनाला दिला असून, धोकादायक गावातील कामांसाठी सुमारे एक कोटी रुपये निधी मंजूर आहे; मात्र पावसाळा सुरू झाला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.भोर तालुक्यातील डेहणे, सोनारवाडी, जांभुळवाडी, धानवली खालची ही गावे वनक्षेत्रात येत आहेत. त्यामुळे सदर गावातील मंजूर कामे वनविभागाच्या परवानगीशिवाय करता येत नाहीत. त्यामुळे सदरची कामे वनविभागाने करायची की सार्वजनिक बांधकाम विभागाने, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रशासनाच्या खेळात पावसाळा आला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यावर्षी कामे होतील की नाही, याबाबत शंका आहे. रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागूनच वरची धानवली म्हणून ८ ते १० घरांची ५० ते ६० लोकांची वस्ती फार पूर्वीपासूनच आहे. डोंगरात असल्याने धोकादायक गाव म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे वरच्या धानवली गावाचे १९९२ मध्ये डोंगरातून सपाटाला पुनर्वसन करण्यात आले आहे. सुमारे ५० कुटुंबे राहतात. खालची धानवलीला जायचे झाल्यास भोरपासून २२ किलोमीटरवर असलेल्या कंकवाडी गावावरून ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून डोंगर चढून जावे लागते, कायमस्वरूपी रस्ता नाही. गावात समाज मंदिर नाही, शाळेची इमारत खराब असून दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे आशा मुकुंद धानवले व भिकू नारायण धानवले यांनी सांगितले. रायरेश्वर गडाकडे जाताना कोर्ले गावांतर्गत जांभुळवाडी असून ही वाडीही धोकादायक आहे, तर भाटघर धरण भागातील डेहेण व सोनारवाडी ही दोन गावेही धोकादायक घोषित केली आहेत; मात्र कामे सुरू नाहीत.पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोकापुणे जिल्ह्यातील २३ पैकी १६ गावांत कामे सुरू झाली आहेत; मात्र भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील गावे वनविभागाच्या क्षेत्रात येत असल्याने या गावातील कामे अद्याप सुरू झालेली नाही. ही कामे त्वरित सुरू करावी; अन्यथा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोका आहे, असे धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व डेहेणेचे सरपंच संदीप दुरकर यांनी सांगितले.या गावांसाठी मंजूर निधीधानवली ५0 लाखडेहेणे २५ लाखसोनारवाडी १६ लाखजांभुळवाडी ८ लाख

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या