शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

भोर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:17 IST

भोर तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.

भोर - तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.तालुक्यातील डोंगर उतारावर असलेली घरे, वाड्या-वस्त्यांना धोका होऊ शकतो. त्यात खालची धानवली, डेहेणे, सोनारवाडी (पांगारी) जांभुळवाडी (कोर्ले) या डोंगरात असणाऱ्या गावात दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करून सदरची गावे धोकादायक म्हणून जाहीर केली असून, या गावात उपाय सुचविण्यासाठी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. तसा अहवाल प्रशासनाला दिला असून, धोकादायक गावातील कामांसाठी सुमारे एक कोटी रुपये निधी मंजूर आहे; मात्र पावसाळा सुरू झाला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.भोर तालुक्यातील डेहणे, सोनारवाडी, जांभुळवाडी, धानवली खालची ही गावे वनक्षेत्रात येत आहेत. त्यामुळे सदर गावातील मंजूर कामे वनविभागाच्या परवानगीशिवाय करता येत नाहीत. त्यामुळे सदरची कामे वनविभागाने करायची की सार्वजनिक बांधकाम विभागाने, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रशासनाच्या खेळात पावसाळा आला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यावर्षी कामे होतील की नाही, याबाबत शंका आहे. रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागूनच वरची धानवली म्हणून ८ ते १० घरांची ५० ते ६० लोकांची वस्ती फार पूर्वीपासूनच आहे. डोंगरात असल्याने धोकादायक गाव म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे वरच्या धानवली गावाचे १९९२ मध्ये डोंगरातून सपाटाला पुनर्वसन करण्यात आले आहे. सुमारे ५० कुटुंबे राहतात. खालची धानवलीला जायचे झाल्यास भोरपासून २२ किलोमीटरवर असलेल्या कंकवाडी गावावरून ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून डोंगर चढून जावे लागते, कायमस्वरूपी रस्ता नाही. गावात समाज मंदिर नाही, शाळेची इमारत खराब असून दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे आशा मुकुंद धानवले व भिकू नारायण धानवले यांनी सांगितले. रायरेश्वर गडाकडे जाताना कोर्ले गावांतर्गत जांभुळवाडी असून ही वाडीही धोकादायक आहे, तर भाटघर धरण भागातील डेहेण व सोनारवाडी ही दोन गावेही धोकादायक घोषित केली आहेत; मात्र कामे सुरू नाहीत.पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोकापुणे जिल्ह्यातील २३ पैकी १६ गावांत कामे सुरू झाली आहेत; मात्र भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील गावे वनविभागाच्या क्षेत्रात येत असल्याने या गावातील कामे अद्याप सुरू झालेली नाही. ही कामे त्वरित सुरू करावी; अन्यथा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोका आहे, असे धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व डेहेणेचे सरपंच संदीप दुरकर यांनी सांगितले.या गावांसाठी मंजूर निधीधानवली ५0 लाखडेहेणे २५ लाखसोनारवाडी १६ लाखजांभुळवाडी ८ लाख

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या