शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

शहरातील धोकादायक होर्डिंग उतरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

पुणे : महापालिकेने जुन्या आणि धोकादायक गॅन्ट्री (जाहिरात होर्डिंग) उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने शहरातील ५० धोकादायक गॅन्ट्री निष्पन्न ...

पुणे : महापालिकेने जुन्या आणि धोकादायक गॅन्ट्री (जाहिरात होर्डिंग) उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने शहरातील ५० धोकादायक गॅन्ट्री निष्पन्न केल्या असून, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या वर्षी, हवा आणि पावसामुळे संचेती रुग्णालयाजवळील ओव्हरहेड गॅन्ट्री कोसळली होती. सुदैवाने रस्त्यावर वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील सर्व कमानींची तपासणी आणि सर्वेक्षण केले होते. आकाशचिन्ह विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरातील विविध परिसरात दोन हजारांपेक्षा अधिक ट्रॅफिक साइन गॅन्ट्री, होर्डिंग्ज आणि जाहिरात होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी महानगरपालिकेला जवळपास ५० धोकादायक गॅन्ट्री सापडल्या असून त्या १० ते १५ वर्षे जुन्या आहेत.

आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय लांडगे म्हणाले, “सर्वेक्षण करताना आम्हाला आढळले की संरचनेत ५० गॅन्ट्री जुन्या आणि कमकुवत अवस्थेत आढळल्या आहेत. त्या कोसळण्याची शक्यता आहे. म्हणूनच या धोकादायक जुन्या गॅन्टरीज उरतविसाठी आणि ती काढून टाकण्यात येणार आहेत. कमानी उतरविणे आणि उतरविल्यानंतर त्याचे सर्व साहित्य संकलित करुन पालिकेच्या गोडाऊनमध्ये साठवण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

पालिकेने जवळपास २६ गॅन्ट्री काढल्या आहेत. आणखी २३ गॅन्ट्री काढायच्या आहेत. आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक धोकादायक व जुन्या गॅन्ट्री पालिकेच्या आहेत. २००८ साली झालेल्या कॉमन वेल्थ गेम दरम्यान बहुतेक गॅन्ट्री उभी केल्या गेल्या. नगर रस्ता, सातारा रस्ता, पौड रोड, बाणेर-बालेवाडी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजी रोड, विमानतळ रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता अशा मुख्य रस्त्यावर या गॅन्ट्री आहेत. २०१८ साली रेल्वे स्थानकाजवळील मंगळवार पेठ भागात होर्डिंग कोसळल्याने चार लोक ठार, तर सात जखमी झाले होते.

ऑक्टोबर २०१८ पूर्वीच्या पालिकेच्या नियमांनुसार होर्डिंग मालकांना लेखापरीक्षण अहवाल दर दोन वर्षांतून एकदा सादर करावे लागतात. तथापि, गेल्या विभागीय परिवहन कार्यालय (आरटीओ) चौकाजवळच होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्यानंतर, दर सहा महिन्यांनी असे अहवाल सादर करण्याचा निर्णय अनिवार्य करण्यात आला होता.