शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Neelam Gorhe: प्रवक्ता होण्यात धोका, पुढे काही पदच मिळत नाही; नीलम गोऱ्हे यांची खंत 

By श्रीकिशन काळे | Updated: April 29, 2023 14:15 IST

विधानपरिषधेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या भावना...

पुणे : राजकीय पक्षाने एकदा प्रवक्ता केले की, त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यांनी फक्त बोलायचे, त्यांना कोणतेच पद मिळत नाही, त्यामुळे प्रवक्ता होणे सोपे नाही. पण मला नंतर उपसभापती होता आले, हा भाग वेगळा आहे,’’ अशा भावना विधानपरिषधेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ पत्रकार कै. वरूणराज भिडे मित्र मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कै. वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्यांनी या वेळी प्रवक्ता होण्यामागील दु:ख उलगडून सांगितले. कारण त्या गेल्या काही वर्षांपासून प्रवक्ता पदावर कार्यरत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा चार जणांना प्रवक्तापदी नियुक्त केले होते. त्यामध्ये गोऱ्हे यांचा समावेश होता. त्या शिवसेनेत पहिल्या महिला प्रवक्त्या बनल्या होत्या. त्या टीव्ही चॅनलवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जायच्या. त्याबाबतचे अनुभव त्यांनी या वेळी सांगितले. चॅनलवरील चर्चा कशी मॅनेज केलेली असते, चर्चेत सहभागी होण्यासाठी कोणा-कोणाला कसे मुद्दाम आणले जाते, याविषयी सविस्तर त्या बोलल्या. तेव्हा प्रवक्ता होणे चांगले असले तरी त्याचे काही धोके आहेत, त्यात एक हा की, प्रवक्ता केवळ बोलतच राहतो, पण त्याला काही पद मिळत नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली.

पण त्यानंतर मला उपसभापती होता आले, हा भाग वेगळा, असेही त्यांनी स्पष्टीकरणही दिले. प्रवक्ता होण्याचा चांगला फायदा हा असतो की, तुम्ही सतत चॅनलसमोर येता आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुम्ही पोचता, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेना