शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:31 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत. त्यानुसार 2019 व 2020 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील.शारीरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, बुध्दीमत्तेला चालणा देणारी आणि विचार करण्यास लावणारी नवीन शिक्षण पध्दती यापुढील काळात राबविली जाईल,असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पुण्यात साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले,या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते.ते म्हणाले,विद्यार्थ्यांचा मेंदू म्हणजे डाटा बँक नाही. सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. त्यातच मद्रास न्यायालयानेविद्यार्थ्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहे. पहिली व दुसरीला एक वदोन पुस्तके असावेत असे या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे 2019 व 2020मध्ये विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार टप्प्या-टप्प्याने कमीझालेला दिसेल.गुण मिळणे म्हणजे शिक्षण नाहीदहावी-बारावीमध्ये विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले तरीही पालकांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण नाही,असे नमूद करून जावडेकर म्हणाले,विद्यार्थ्यांकडे शारीरिक शिक्षणासाठी वेळ नाही. विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या गोष्टीतूनही शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे अध्यापन व अध्ययन याकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.सध्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असलेले सर्जनशील कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही.परंतु, नवीन शिक्षण पध्दतीमध्ये याचा अंतर्भाव केला जाईल.