शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

विजेअभावी पिके लागली होरपळू

By admin | Updated: May 1, 2017 02:08 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन केले जात आहे. भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनू लागला आहे. भीमा नदीला भामा झ्र आसखेड धरणातून तर चासकमान धरणातून डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुरु आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने उन्हाळी हंगामातील पिके होरपळून जाऊ लागली आहे. वाढत्या भारनियमना विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी-भानोबाची, मोहीतेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदि गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे अठरा तास भारनियमन सुरु आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाऱ्या भारनियमनामुळे या गावांमधील उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून भामा आसखेड धरणातून तसेच चासकमान डाव्या कालव्यामार्फत शेतीसाठी पाण्याचे विशेष आवर्तन सुरु आहे. एकीकडे वेळेवर आवर्तन मिळाल्याने घटलेली पाणी पातळी वाढून पाण्याचे स्रोत पुन्हा एकदा भरत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत होते. अशातच वीजेच्या समस्येने डोके वर काढल्याने शेतकरी द्विधावस्थेत सापडू लागला आहे. चालू उन्हाळी हंगामात काहीलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. मात्र अठरा तास वीज गायब असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन रद्द करून अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, शरद मोहिते, धैर्यशील पानसरे, एकनाथ आवटे, सुभाष वाडेकर, संतोष आवटे, शशिकांत मोरे, तुषार झरेकर, काळूराम दौंडकर, सजेर्राव मोहिते, पठाणराव वाडेकर, राजाराम साबळे, राजेश म्हस्के, सागर दौडकर, तुषार बवले, श्याम बवले, संतोष साबळे, योगेश मोरे, निखील मोहिते, विशाल दौडकर, भूदेव शिंदे, विनोद चोपडा, सोपान निकम आदींकडून केली जात आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात १८ तासांहून अधिक काळ होत असलेल्या भारनियमनाचा उन्हाळी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विजेचे वेळापत्रक दर आठवड्याला बदलले जात असून एका आठवड्यात दिवसा फक्त सहा तर दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी वीज दिली जात आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. परिणामी ऊस, बाजरी, गवार, मिरची, वाल तसेच पालेभाज्या जळून जात आहेत. पूर्व भागातील गावांमध्ये चासकमान व भामा झ्र आसखेड धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र महावितरण कंपनीच्या दुपट्टी धोरणामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. वेळेवर वीज बिल भरूनही शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकप्रतीनिधींना शेतकऱ्यांच्या समस्येचे काही देणे घेणे नाही. - दिलीप मोहितपाटील, माजी आमदार खेडनित्याच्या अठरा तासांच्या भारनियमनामुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे सिंचन करता येत नाही. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तात्काळ सोडविला पाहिजे. याविरोधात शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत रास्तारोकोचा ठराव घेऊन आंदोलन केले जाणार आहे. - एकनाथ आवटे, उपसरपंच शेलगावमागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न अतिशय बिकट होऊ लागला आहे. दिवसात एका एकराचेही सिंचन होत नसल्याने पिके संकटात येऊ लागली असून आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनदरबारी पाठपुरावा करूनही आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत.- संतोष साबळे, जिल्हाध्यक्ष माहिती सेवा समितीशेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष....अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करत आहेत. मात्र कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाय - योजना आखल्या जात नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या काहिलीपासून उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.