शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिके लागली होरपळू

By admin | Updated: May 1, 2017 02:08 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन केले जात आहे. भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनू लागला आहे. भीमा नदीला भामा झ्र आसखेड धरणातून तर चासकमान धरणातून डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुरु आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने उन्हाळी हंगामातील पिके होरपळून जाऊ लागली आहे. वाढत्या भारनियमना विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी-भानोबाची, मोहीतेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदि गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे अठरा तास भारनियमन सुरु आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाऱ्या भारनियमनामुळे या गावांमधील उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून भामा आसखेड धरणातून तसेच चासकमान डाव्या कालव्यामार्फत शेतीसाठी पाण्याचे विशेष आवर्तन सुरु आहे. एकीकडे वेळेवर आवर्तन मिळाल्याने घटलेली पाणी पातळी वाढून पाण्याचे स्रोत पुन्हा एकदा भरत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत होते. अशातच वीजेच्या समस्येने डोके वर काढल्याने शेतकरी द्विधावस्थेत सापडू लागला आहे. चालू उन्हाळी हंगामात काहीलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. मात्र अठरा तास वीज गायब असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन रद्द करून अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, शरद मोहिते, धैर्यशील पानसरे, एकनाथ आवटे, सुभाष वाडेकर, संतोष आवटे, शशिकांत मोरे, तुषार झरेकर, काळूराम दौंडकर, सजेर्राव मोहिते, पठाणराव वाडेकर, राजाराम साबळे, राजेश म्हस्के, सागर दौडकर, तुषार बवले, श्याम बवले, संतोष साबळे, योगेश मोरे, निखील मोहिते, विशाल दौडकर, भूदेव शिंदे, विनोद चोपडा, सोपान निकम आदींकडून केली जात आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात १८ तासांहून अधिक काळ होत असलेल्या भारनियमनाचा उन्हाळी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विजेचे वेळापत्रक दर आठवड्याला बदलले जात असून एका आठवड्यात दिवसा फक्त सहा तर दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी वीज दिली जात आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. परिणामी ऊस, बाजरी, गवार, मिरची, वाल तसेच पालेभाज्या जळून जात आहेत. पूर्व भागातील गावांमध्ये चासकमान व भामा झ्र आसखेड धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र महावितरण कंपनीच्या दुपट्टी धोरणामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. वेळेवर वीज बिल भरूनही शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकप्रतीनिधींना शेतकऱ्यांच्या समस्येचे काही देणे घेणे नाही. - दिलीप मोहितपाटील, माजी आमदार खेडनित्याच्या अठरा तासांच्या भारनियमनामुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे सिंचन करता येत नाही. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तात्काळ सोडविला पाहिजे. याविरोधात शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत रास्तारोकोचा ठराव घेऊन आंदोलन केले जाणार आहे. - एकनाथ आवटे, उपसरपंच शेलगावमागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न अतिशय बिकट होऊ लागला आहे. दिवसात एका एकराचेही सिंचन होत नसल्याने पिके संकटात येऊ लागली असून आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनदरबारी पाठपुरावा करूनही आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत.- संतोष साबळे, जिल्हाध्यक्ष माहिती सेवा समितीशेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष....अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करत आहेत. मात्र कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाय - योजना आखल्या जात नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या काहिलीपासून उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.