शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

विजेअभावी पिके लागली होरपळू

By admin | Updated: May 1, 2017 02:08 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून विद्युतपंपाच्या विजेचे सलग अठरा तास भारनियमन केले जात आहे. भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनू लागला आहे. भीमा नदीला भामा झ्र आसखेड धरणातून तर चासकमान धरणातून डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुरु आहे. परंतु विजेअभावी पिकांचे सिंचन करता येत नसल्याने उन्हाळी हंगामातील पिके होरपळून जाऊ लागली आहे. वाढत्या भारनियमना विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी-भानोबाची, मोहीतेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, नवीनगाव आदि गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे अठरा तास भारनियमन सुरु आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाऱ्या भारनियमनामुळे या गावांमधील उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून भामा आसखेड धरणातून तसेच चासकमान डाव्या कालव्यामार्फत शेतीसाठी पाण्याचे विशेष आवर्तन सुरु आहे. एकीकडे वेळेवर आवर्तन मिळाल्याने घटलेली पाणी पातळी वाढून पाण्याचे स्रोत पुन्हा एकदा भरत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत होते. अशातच वीजेच्या समस्येने डोके वर काढल्याने शेतकरी द्विधावस्थेत सापडू लागला आहे. चालू उन्हाळी हंगामात काहीलींचा चटका जास्त क्षमतेने बसत असल्याने हंगामात पिकांच्या योग्य वाढीसाठी इतर हंगामाच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट पाणी द्यावे लागत आहे. मात्र अठरा तास वीज गायब असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असूनही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विजेचे भारनियमन रद्द करून अखंडित वीज उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, शरद मोहिते, धैर्यशील पानसरे, एकनाथ आवटे, सुभाष वाडेकर, संतोष आवटे, शशिकांत मोरे, तुषार झरेकर, काळूराम दौंडकर, सजेर्राव मोहिते, पठाणराव वाडेकर, राजाराम साबळे, राजेश म्हस्के, सागर दौडकर, तुषार बवले, श्याम बवले, संतोष साबळे, योगेश मोरे, निखील मोहिते, विशाल दौडकर, भूदेव शिंदे, विनोद चोपडा, सोपान निकम आदींकडून केली जात आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात १८ तासांहून अधिक काळ होत असलेल्या भारनियमनाचा उन्हाळी हंगामातील शेतपिकांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विजेचे वेळापत्रक दर आठवड्याला बदलले जात असून एका आठवड्यात दिवसा फक्त सहा तर दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी वीज दिली जात आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही पिकांचे वेळेवर सिंचन करता येत नाही. परिणामी ऊस, बाजरी, गवार, मिरची, वाल तसेच पालेभाज्या जळून जात आहेत. पूर्व भागातील गावांमध्ये चासकमान व भामा झ्र आसखेड धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र महावितरण कंपनीच्या दुपट्टी धोरणामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता येत नाही. वेळेवर वीज बिल भरूनही शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळत नसेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकप्रतीनिधींना शेतकऱ्यांच्या समस्येचे काही देणे घेणे नाही. - दिलीप मोहितपाटील, माजी आमदार खेडनित्याच्या अठरा तासांच्या भारनियमनामुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे सिंचन करता येत नाही. गंभीर बनत चाललेला विजेचा तिढा महावितरण कंपनीनी तात्काळ सोडविला पाहिजे. याविरोधात शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत रास्तारोकोचा ठराव घेऊन आंदोलन केले जाणार आहे. - एकनाथ आवटे, उपसरपंच शेलगावमागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न अतिशय बिकट होऊ लागला आहे. दिवसात एका एकराचेही सिंचन होत नसल्याने पिके संकटात येऊ लागली असून आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनदरबारी पाठपुरावा करूनही आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत.- संतोष साबळे, जिल्हाध्यक्ष माहिती सेवा समितीशेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष....अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करत आहेत. मात्र कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाय - योजना आखल्या जात नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या काहिलीपासून उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.