शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पावसाअभावी भातपिकाचे नुकसान, शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:04 IST

भोर येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

भोर : येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.या परिसरात भाताची सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तर मागील १२ ते १५ दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने व भातखाचरातील पाणी आटल्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे. त्यामुळे भातपिकावर विपरीत परिणाम होऊन विषाणुजन्य करप्या व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाताचे पीक कमी होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.भोर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८८५९२ हेक्टर असून, खरीप पिकाखालील १५५ गावे असून, २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर रब्बी पिकाखालील गावे ४१ असून क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हे तर जिरायती क्षेत्र ३०३०८ हे असून, एकूण लागवडीखालील क्षेत्र ३७६४२ हे आहे. तालुक्यातील प्रमुख पीक भात असून, ५० हेक्टरवर रोपवाटिका तयार करून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात इंद्रायणी, बासमती, फुले, समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत, आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. तालुक्यात भाताची ७५०० हेक्टवर लागवड झाली असून, त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे.या वर्षी वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्याने ५० हेक्टरवर भाताचे बी पेरले होते. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली असून, भाताचे पीक जोमात होते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारल्याने सध्या भात पोषण्याची वेळ असताना मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने डोंगरउतारावरील झरे आटले असून, ओढ्यानाल्यांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे माळरानावरील भातखाचरातील पाणी आटल्याने खाचरात वड्या पडल्या असून, भातावर काही ठिकाणी जीवाणुजन्य करपा, तर काही भागात विषाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिके पिवळी पडू लागली आहेत. अनेक ठिकाणी भाताचे दाणे बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणा भरण्यास अडचण होणार असल्याचे दिनकर कुडपणे यांनी सांगितले.५0 एकरवर लागवडतालुक्यातील हिर्डोशी, महुडे, वेळवंड, भुतोंडे, आंबवडे, वीसगाव खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते.यामुळे सदर विभागाला भाताचे आगार समजले जाते, तर सध्या कृषी विभागाच्या मदतीने यंत्राद्वारे, हातवे, सणसवाडी, माळेगाव, नाटंबी, महुडे, खानापूर या गावांत रोपवाटिका करून ५० एकरवर भाताची लागवड आधुनिक पद्धतीने केली आहे. शेतकºयांचा कल भातशेतीही आधुनिक पद्धतीने करण्याकडे वाढत असल्याने पुढील काळात यात अजून वाढ होणार आहे.मागील १४ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खाचरातील पाणी कमी झाले असून, पावसाअभावी वातावरणातील बदल, अन्नद्रव्य याच्या कमतरतेमुळे भातपिकावर विपरीत परिणाम झाला असून, पिकावर विषाणुजन्य करपा आणि जीवाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे. पिकांवर यापुढील आठवडाभर पाऊस आला नाही तर भाताचे पीक पोषण्यास अडचण होऊन पिकावर उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. यावर उपाय म्हणून खाचरात पाणी सोडावे.नत्राचा पाण्याच्या उपलब्धतेनुसार वापर करावा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळून फवारणी करावी.भात कीड नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे