शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पावसाअभावी भातपिकाचे नुकसान, शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:04 IST

भोर येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

भोर : येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.या परिसरात भाताची सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तर मागील १२ ते १५ दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने व भातखाचरातील पाणी आटल्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे. त्यामुळे भातपिकावर विपरीत परिणाम होऊन विषाणुजन्य करप्या व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाताचे पीक कमी होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.भोर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८८५९२ हेक्टर असून, खरीप पिकाखालील १५५ गावे असून, २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर रब्बी पिकाखालील गावे ४१ असून क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हे तर जिरायती क्षेत्र ३०३०८ हे असून, एकूण लागवडीखालील क्षेत्र ३७६४२ हे आहे. तालुक्यातील प्रमुख पीक भात असून, ५० हेक्टरवर रोपवाटिका तयार करून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात इंद्रायणी, बासमती, फुले, समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत, आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. तालुक्यात भाताची ७५०० हेक्टवर लागवड झाली असून, त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे.या वर्षी वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्याने ५० हेक्टरवर भाताचे बी पेरले होते. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली असून, भाताचे पीक जोमात होते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारल्याने सध्या भात पोषण्याची वेळ असताना मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने डोंगरउतारावरील झरे आटले असून, ओढ्यानाल्यांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे माळरानावरील भातखाचरातील पाणी आटल्याने खाचरात वड्या पडल्या असून, भातावर काही ठिकाणी जीवाणुजन्य करपा, तर काही भागात विषाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिके पिवळी पडू लागली आहेत. अनेक ठिकाणी भाताचे दाणे बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणा भरण्यास अडचण होणार असल्याचे दिनकर कुडपणे यांनी सांगितले.५0 एकरवर लागवडतालुक्यातील हिर्डोशी, महुडे, वेळवंड, भुतोंडे, आंबवडे, वीसगाव खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते.यामुळे सदर विभागाला भाताचे आगार समजले जाते, तर सध्या कृषी विभागाच्या मदतीने यंत्राद्वारे, हातवे, सणसवाडी, माळेगाव, नाटंबी, महुडे, खानापूर या गावांत रोपवाटिका करून ५० एकरवर भाताची लागवड आधुनिक पद्धतीने केली आहे. शेतकºयांचा कल भातशेतीही आधुनिक पद्धतीने करण्याकडे वाढत असल्याने पुढील काळात यात अजून वाढ होणार आहे.मागील १४ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खाचरातील पाणी कमी झाले असून, पावसाअभावी वातावरणातील बदल, अन्नद्रव्य याच्या कमतरतेमुळे भातपिकावर विपरीत परिणाम झाला असून, पिकावर विषाणुजन्य करपा आणि जीवाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे. पिकांवर यापुढील आठवडाभर पाऊस आला नाही तर भाताचे पीक पोषण्यास अडचण होऊन पिकावर उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. यावर उपाय म्हणून खाचरात पाणी सोडावे.नत्राचा पाण्याच्या उपलब्धतेनुसार वापर करावा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळून फवारणी करावी.भात कीड नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे