शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:52 IST

रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल...

ठळक मुद्देडॉ. अपर्णा जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, हे सांगणारे शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल. आदर्श हे कालानुरूप बदलत असतात. त्याची चिकित्सा ही जरूर केली गेली पाहिजे. परंपरेला प्रश्न विचारण्यासाठी अंगाी धाडस असावे लागते, असे मत साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखिका व संशोधिका डॉ. अपर्णा जोशी यांच्या ‘राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व प्रकाशक जयंत कुलकर्णी उपस्थित होते. भांडारकर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे तर जीवनरुपी अर्थ शिकवण्याची गरज आहे. नैतिकता आणि धर्माचा मूळ अर्थ हे सारे आम्ही गमावले आहे. कर्तव्य म्हणजे धर्म असेल तर या धर्माचे आम्ही पालन करतो का, याचा विचार झाला पाहिजे. पाठ्यपुस्तकात आहे त्यापेक्षा मोठा अवकाश विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. त्यातून एखादा विद्याार्थी टिपकागदाप्रमाणे टिपेल. अभ्यास करून नवी मांडणी करेल आणि संशोधन विषय पुढे घेऊन जाईल. आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसते. तर, कालानुरूप बदलत असते. दरवेळी त्या आदर्शांना कालानुरूप तपासून घ्यावे लागते. वाचन, संगीत, चित्र या अदृश्य आनंदातून माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया घडते.’ डॉ. जोशी म्हणाल्या, ‘अव्यभिचारी निष्ठा म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ आपल्या देशाचे अमूल्य ठेवा आहेत. महाभारतातल्या अनेक कथा या मूल्यशिक्षण देणा-या आहेत. राष्ट्रीय एकात्मता, एकजूट शिकवणारा महान ग्रंथ असे महाभारताबद्दल निश्चित म्हणता येईल. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्राच्या एकात्मते संदर्भात महाभारतातील अनेक कथांचा शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी जरूर बोध घेतला पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्य आणि अहिंसा याचा विचार आपल्याला महाभारतातून मिळतो.’कुलकर्णी म्हणाल्या, ‘रामायण रामाची कथा आहे. त्याप्रमाणे महाभारत ही कृष्णाची, अजुर्नाची नाही तर अवघ्या भारताची कथा आहे. महाभारत आपल्याला सत्य, सौहार्द, समन्वय आणि धाडस या चार गोष्टी शिकवते.’

टॅग्स :PuneपुणेAruna Dhereअरुणा ढेरेramayanरामायण