शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:52 IST

रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल...

ठळक मुद्देडॉ. अपर्णा जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, हे सांगणारे शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल. आदर्श हे कालानुरूप बदलत असतात. त्याची चिकित्सा ही जरूर केली गेली पाहिजे. परंपरेला प्रश्न विचारण्यासाठी अंगाी धाडस असावे लागते, असे मत साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखिका व संशोधिका डॉ. अपर्णा जोशी यांच्या ‘राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व प्रकाशक जयंत कुलकर्णी उपस्थित होते. भांडारकर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे तर जीवनरुपी अर्थ शिकवण्याची गरज आहे. नैतिकता आणि धर्माचा मूळ अर्थ हे सारे आम्ही गमावले आहे. कर्तव्य म्हणजे धर्म असेल तर या धर्माचे आम्ही पालन करतो का, याचा विचार झाला पाहिजे. पाठ्यपुस्तकात आहे त्यापेक्षा मोठा अवकाश विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. त्यातून एखादा विद्याार्थी टिपकागदाप्रमाणे टिपेल. अभ्यास करून नवी मांडणी करेल आणि संशोधन विषय पुढे घेऊन जाईल. आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसते. तर, कालानुरूप बदलत असते. दरवेळी त्या आदर्शांना कालानुरूप तपासून घ्यावे लागते. वाचन, संगीत, चित्र या अदृश्य आनंदातून माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया घडते.’ डॉ. जोशी म्हणाल्या, ‘अव्यभिचारी निष्ठा म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ आपल्या देशाचे अमूल्य ठेवा आहेत. महाभारतातल्या अनेक कथा या मूल्यशिक्षण देणा-या आहेत. राष्ट्रीय एकात्मता, एकजूट शिकवणारा महान ग्रंथ असे महाभारताबद्दल निश्चित म्हणता येईल. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्राच्या एकात्मते संदर्भात महाभारतातील अनेक कथांचा शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी जरूर बोध घेतला पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्य आणि अहिंसा याचा विचार आपल्याला महाभारतातून मिळतो.’कुलकर्णी म्हणाल्या, ‘रामायण रामाची कथा आहे. त्याप्रमाणे महाभारत ही कृष्णाची, अजुर्नाची नाही तर अवघ्या भारताची कथा आहे. महाभारत आपल्याला सत्य, सौहार्द, समन्वय आणि धाडस या चार गोष्टी शिकवते.’

टॅग्स :PuneपुणेAruna Dhereअरुणा ढेरेramayanरामायण