शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सोयाबीनची उगवण न झाल्याने कृषिधन कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडु नानाभाऊ अंभोरे (रा. शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या कृषिधन कंपनीच्या मॅनेजरचे नाव आहे.

याप्रकरणी जुन्नर तालुका कृषि अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूकीसह बियाणे कायदा ६ बी, ७ बी सह बियाणे नियम कलम २३ ए/२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जून ते १ जुलै २०२० दरम्यान घडला होता.

जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामामध्ये कृषिधन प्रा. लि. जालना या कंपनीने सोयाबीन बियाणे (के एस एल ४४१) वाणीची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. मात्र, या बियाणांची उगवणी झाली नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. जुन्नर तालुक्यातील कोंबरवाडी, आर्वी, पिंपळगाव, गोळेगाव, बेल्हे या गावातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह ३२ शेतकर्यांनी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्या होता. त्याची चौकशी कृषि अधिकारी शिरसाठ यांनी केली. कंपनीकडून विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही १५ ते ३० टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कृषिधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रोडवरील साई कॅपिटल येथे असल्याने हा गुन्हा आळेफाटा पोलिसांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.