शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सोयाबीनची उगवण न झाल्याने कृषिधन कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडु नानाभाऊ अंभोरे (रा. शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या कृषिधन कंपनीच्या मॅनेजरचे नाव आहे.

याप्रकरणी जुन्नर तालुका कृषि अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूकीसह बियाणे कायदा ६ बी, ७ बी सह बियाणे नियम कलम २३ ए/२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जून ते १ जुलै २०२० दरम्यान घडला होता.

जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामामध्ये कृषिधन प्रा. लि. जालना या कंपनीने सोयाबीन बियाणे (के एस एल ४४१) वाणीची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. मात्र, या बियाणांची उगवणी झाली नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. जुन्नर तालुक्यातील कोंबरवाडी, आर्वी, पिंपळगाव, गोळेगाव, बेल्हे या गावातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह ३२ शेतकर्यांनी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्या होता. त्याची चौकशी कृषि अधिकारी शिरसाठ यांनी केली. कंपनीकडून विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही १५ ते ३० टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कृषिधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रोडवरील साई कॅपिटल येथे असल्याने हा गुन्हा आळेफाटा पोलिसांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.