शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

वृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:33 IST

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : जेवण न देता करीत मानसिक छळ

पुणे : वंशाचा दिवा म्हातारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून, त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनीच उतारवयात अशी परतफेड केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मुलांनी मदत करावी, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत आहे.

मुलं संभाळ करीत नाहीत. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात म्हणून एका ९४ वर्षीय महिलेने मुलीच्या माध्यमातून थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी सामाजिक बांधीलकी आणि शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वृद्ध मातेला न्याय मिळावा म्हणून तिच्या दोन मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित ज्येष्ठ महिला या दत्तवाडीतील लायन क्लब परिसरात राहायला आहे. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. मुलीचे लग्न झाले असून मोठा मुलगा कोथरूड येथे राहतो, तर छोट्या मुलाचे निधन झाले आहे. त्याची पत्नी व तीन मुली पीडित महिलेबरोबर दत्तवाडीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली त्या नातीला घेऊन फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी एका हातगाडीचा धक्का लागून त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला होता. आॅपरेशन झाल्याने त्या सर्व वैयक्तिक विधी जागेवरच करत. त्यामुळे सून व नात या देखभाल न करता त्यांना शिवीगाळ करायच्या. तसेच त्यांना खायलाही वेळेवर न देता सारख्या ओरडत असत.कधीकधी अंगावर धावून येत व जीवे मारण्याच्या धमकी देत असत. या काळात मोठी नात व तिच्या पतीने घरातील इतरांच्या मदतीने त्यांना खोटी माहिती देत पीडितेच्या नावावर असलेले घर स्वत:च्या नावे बक्षीसपत्र करून त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर आता ते सर्व पीडित महिलेला घरात राहून देत नाही. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात. त्यामुळे त्या गेल्या १० महिन्यांपासून मुलीच्या घरी राहत आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी आणि ज्येष्ठ नागरिक कक्षाने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून वृद्ध आईला सांभाळण्यास सांगितले होते. मात्र कोणीही त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सामाजिक बांधीलकी व शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाला अनुसरून वृद्ध मातेला न्याय मिळावा यासाठी दोन्ही मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.पती होते सैन्यात जवानच्पीडित महिलेचे सैन्यात नोकरीस असणाºया जवानाशी लग्न झाले होते. नारायण पेठेत त्यांनी आपला संसार सुरू केला होता.च्मात्र पानशेत दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी पूरग्रस्तांना दत्तवाडीमध्ये जागा देण्यात आल्या होत्या.च्तेव्हापासून त्या पतीसोबत तिथे राहत. पतीचे १९९० साली निधन झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे