शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:05 IST

जव्हार तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.

जव्हार : तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.त्यानंतर भात, नागली, वरई, पिकांची रोपं तयार करतो. अशा प्रकारे पारंपारिक शेती करताना झाडांच्या फांद्या तोडणाºया शेतकºयांवर जव्हार उपवन संरक्षक अमित मिश्रा यांच्या आदेशाने वनविभागाचे कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्र मक झाले असून, शुक्र वारी जव्हार उपवन संरक्षक यांच्या कार्यालायवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली हजारोंच्या संख्येने जव्हार बसस्थानक ते वनविभाग उपवन संरक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातील शेती ही डोंगराळ भागातील असून, झाडांचा पालापाचोळा व झाडांच्या फाद्यांची छाटनी केल्याशिवाय शेतीची भाजणी होत नाही. मात्र, शेतीची राबणी (भाजणी) करण्यासाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करणाºया शेतकºयांवर वनविभागाने गुन्हे दाखल करायला लावले आहेत. शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही झाडांचा शेंडा किंवा संपूर्ण झाडांची तोडणी करीत नाही. तर पालापाचोळा व लहानसहान मोजक्या फांद्या तोंडून राब करतो. तसेच आमची डोंगराळ भागातील बहुतांश शेती असल्याने आम्ही पिढोंन पिढ्या शेती करीत आहोत.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली काढलेल्या या मोर्चा दरम्यान प्रांत कार्यालयाच्या शेजारी शेतकºयांची भव्य सभा घेऊन शेतक-यांना वणी दिंडोरीचे आमदार जे.पी. गावित व जि. प.सदस्य रतन बुधर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी प.स.सदस्य- यशवंत घाटाळ, प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, राजा गहाला, किरण गहाला,चिंतू कलन, ताई बेंदर, तसेच शिवराम बुधर यांनी पुढाकार घेतला होता.झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही वनविभागाने गुन्हे मागे घ्यावेआंदोलनकत्या शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठल्याही झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही. परंतु वनविभागाने शेतकºयांवर झाडांच्या कत्तली बाबत केलेली कारवाई ही चुकीची असून, वनविभागाने दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत. शेतकºयांनी जंगलाची कुठलीही नुकसान केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर वनविभागाकडून होत असलेली कारवाई थांबवावी व या शेतकºयांना झाडांच्या फांद्या, पालापाचोळा गोळा करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी वनविभागावर धडक मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार