शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:05 IST

जव्हार तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.

जव्हार : तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.त्यानंतर भात, नागली, वरई, पिकांची रोपं तयार करतो. अशा प्रकारे पारंपारिक शेती करताना झाडांच्या फांद्या तोडणाºया शेतकºयांवर जव्हार उपवन संरक्षक अमित मिश्रा यांच्या आदेशाने वनविभागाचे कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्र मक झाले असून, शुक्र वारी जव्हार उपवन संरक्षक यांच्या कार्यालायवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली हजारोंच्या संख्येने जव्हार बसस्थानक ते वनविभाग उपवन संरक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातील शेती ही डोंगराळ भागातील असून, झाडांचा पालापाचोळा व झाडांच्या फाद्यांची छाटनी केल्याशिवाय शेतीची भाजणी होत नाही. मात्र, शेतीची राबणी (भाजणी) करण्यासाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करणाºया शेतकºयांवर वनविभागाने गुन्हे दाखल करायला लावले आहेत. शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही झाडांचा शेंडा किंवा संपूर्ण झाडांची तोडणी करीत नाही. तर पालापाचोळा व लहानसहान मोजक्या फांद्या तोंडून राब करतो. तसेच आमची डोंगराळ भागातील बहुतांश शेती असल्याने आम्ही पिढोंन पिढ्या शेती करीत आहोत.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली काढलेल्या या मोर्चा दरम्यान प्रांत कार्यालयाच्या शेजारी शेतकºयांची भव्य सभा घेऊन शेतक-यांना वणी दिंडोरीचे आमदार जे.पी. गावित व जि. प.सदस्य रतन बुधर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी प.स.सदस्य- यशवंत घाटाळ, प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, राजा गहाला, किरण गहाला,चिंतू कलन, ताई बेंदर, तसेच शिवराम बुधर यांनी पुढाकार घेतला होता.झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही वनविभागाने गुन्हे मागे घ्यावेआंदोलनकत्या शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठल्याही झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही. परंतु वनविभागाने शेतकºयांवर झाडांच्या कत्तली बाबत केलेली कारवाई ही चुकीची असून, वनविभागाने दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत. शेतकºयांनी जंगलाची कुठलीही नुकसान केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर वनविभागाकडून होत असलेली कारवाई थांबवावी व या शेतकºयांना झाडांच्या फांद्या, पालापाचोळा गोळा करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी वनविभागावर धडक मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार