शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:05 IST

जव्हार तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.

जव्हार : तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.त्यानंतर भात, नागली, वरई, पिकांची रोपं तयार करतो. अशा प्रकारे पारंपारिक शेती करताना झाडांच्या फांद्या तोडणाºया शेतकºयांवर जव्हार उपवन संरक्षक अमित मिश्रा यांच्या आदेशाने वनविभागाचे कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्र मक झाले असून, शुक्र वारी जव्हार उपवन संरक्षक यांच्या कार्यालायवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली हजारोंच्या संख्येने जव्हार बसस्थानक ते वनविभाग उपवन संरक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.तालुक्यातील शेती ही डोंगराळ भागातील असून, झाडांचा पालापाचोळा व झाडांच्या फाद्यांची छाटनी केल्याशिवाय शेतीची भाजणी होत नाही. मात्र, शेतीची राबणी (भाजणी) करण्यासाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करणाºया शेतकºयांवर वनविभागाने गुन्हे दाखल करायला लावले आहेत. शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही झाडांचा शेंडा किंवा संपूर्ण झाडांची तोडणी करीत नाही. तर पालापाचोळा व लहानसहान मोजक्या फांद्या तोंडून राब करतो. तसेच आमची डोंगराळ भागातील बहुतांश शेती असल्याने आम्ही पिढोंन पिढ्या शेती करीत आहोत.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली काढलेल्या या मोर्चा दरम्यान प्रांत कार्यालयाच्या शेजारी शेतकºयांची भव्य सभा घेऊन शेतक-यांना वणी दिंडोरीचे आमदार जे.पी. गावित व जि. प.सदस्य रतन बुधर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी प.स.सदस्य- यशवंत घाटाळ, प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, राजा गहाला, किरण गहाला,चिंतू कलन, ताई बेंदर, तसेच शिवराम बुधर यांनी पुढाकार घेतला होता.झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही वनविभागाने गुन्हे मागे घ्यावेआंदोलनकत्या शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठल्याही झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही. परंतु वनविभागाने शेतकºयांवर झाडांच्या कत्तली बाबत केलेली कारवाई ही चुकीची असून, वनविभागाने दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत. शेतकºयांनी जंगलाची कुठलीही नुकसान केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर वनविभागाकडून होत असलेली कारवाई थांबवावी व या शेतकºयांना झाडांच्या फांद्या, पालापाचोळा गोळा करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी वनविभागावर धडक मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार