शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

उसाला प्रतिटन ३००० रुपये भाव

By admin | Updated: July 24, 2016 05:43 IST

दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून, उसाचा चारा व नवीन आडसाली लागवडीसाठी विक्री करीत, प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांची कमाई करण्याचा नवा फंडा पाणलोट क्षेत्रातील ऊस

इंदापूर : दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून, उसाचा चारा व नवीन आडसाली लागवडीसाठी विक्री करीत, प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांची कमाई करण्याचा नवा फंडा पाणलोट क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे नेहमीच्या दुष्काळाची तीव्रता अधिकच भयानक केली होती. त्यातच पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. राजकीय पक्षांनी त्याच्याविरोधात आवाज उठवला. शेतकऱ्यांनी त्यांना खंबीर साथ दिली. वीजकपातीचा निर्णय शिथिल करून पाच तास वीजपुरवठा करण्याचे शासनाने जाहीर केले. निर्णयाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन, आहे त्या पाणी व वीजपुरवठ्यावर पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस चांगला जोपासला. तथापि यंदाच्या जूनमध्ये पावसाने ‘ये रे माझ्या मागल्या’चाच कित्ता गिरवला. चाऱ्याची टंचाई भीषण झाली. उसाचाच चारा म्हणून वापर करणे अपरिहार्य झाले. ऊस चांगला जोपासल्याने चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. चाऱ्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी पाणलोट क्षेत्रात येऊ लागले. चारा घेता घेता, नवीन आडसाली उसाच्या लागवडीसाठी उसाची मागणी करू लागले. दर चांगला देण्याची तयारी दाखवली. संकटातील या संधीचे पाणलोट क्षेत्रात पैसे झाले. (वार्ताहर)

वेळापूर, अकलूज, नातेपुते, फलटण भागातून मागणी येत आहे. प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांचा दर मिळतो आहे. तुटून गेलेल्या उसाचा खोडवा चांगल्या रीतीने सांभाळून या वर्षी कारखान्याला घालण्याची खबरदारीही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे. उसाचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग करू नये. उसामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. - राजेंद्र वाघमोडे, संचालक, म. फुले कृषी विज्ञान केंद्र