शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई नक्की मागायची कोणाकडे?

By admin | Updated: February 24, 2015 00:22 IST

कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये १६ शेतकऱ्यांचे ४२ एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसाला आग उच्चदाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे असे प्रश्न उपस्थित करून महावितरण व महापारेषण जबबादारी एकमेकांवर टाकत आहेत. त्यामुळे भरपाई नक्की कोणाकडे मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.जळीत उसाची साखर कारखान्यांनी त्वरित तोडणी करण्याची व जळीत उसाच्या बिलामध्ये कोणतीच कपात करू नये, अशी मागणी मधुकर गव्हाणे यांनी केली आहे . आग नक्की कशामुळे लागली, याचा अहवाल दोन-तीन दिवसांत वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याचे विद्युत निरीक्षक एम. एस. जगताप यांनी सांगितले.नुकसानीचा पंचनामा कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व कृषी सहायक श्रीमती आरती कारंडे यांनी केला. महावितरणने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले; तर आग उच्च दाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याबाबत हे दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापेक्षा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अशा सूचना केल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले. जळालेल्या उसाची त्वरित तोडणी करण्यासाठी कारखान्यामार्फत हार्वेस्टर मशिनची तत्काळ उपलब्धता करून सर्व बाधित शेतकऱ्यांचा ऊस दोन-तीन दिवसांत नेण्यासाठी प्रयत्न करतानाच वीज कंपनीनेही त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आमदार व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)