शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

भरपाई नक्की मागायची कोणाकडे?

By admin | Updated: February 24, 2015 00:22 IST

कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे रविवारी वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला लागलेल्या आगीमध्ये १६ शेतकऱ्यांचे ४२ एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे सुमारे २५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसाला आग उच्चदाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे असे प्रश्न उपस्थित करून महावितरण व महापारेषण जबबादारी एकमेकांवर टाकत आहेत. त्यामुळे भरपाई नक्की कोणाकडे मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.जळीत उसाची साखर कारखान्यांनी त्वरित तोडणी करण्याची व जळीत उसाच्या बिलामध्ये कोणतीच कपात करू नये, अशी मागणी मधुकर गव्हाणे यांनी केली आहे . आग नक्की कशामुळे लागली, याचा अहवाल दोन-तीन दिवसांत वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याचे विद्युत निरीक्षक एम. एस. जगताप यांनी सांगितले.नुकसानीचा पंचनामा कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व कृषी सहायक श्रीमती आरती कारंडे यांनी केला. महावितरणने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले; तर आग उच्च दाब क्षमतेच्या वाहिनीमुळे लागली की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याबाबत हे दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापेक्षा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अशा सूचना केल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले. जळालेल्या उसाची त्वरित तोडणी करण्यासाठी कारखान्यामार्फत हार्वेस्टर मशिनची तत्काळ उपलब्धता करून सर्व बाधित शेतकऱ्यांचा ऊस दोन-तीन दिवसांत नेण्यासाठी प्रयत्न करतानाच वीज कंपनीनेही त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी माजी आमदार व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)