शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

By admin | Updated: July 21, 2015 09:11 IST

शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या

पुणे : शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र नगरसेवक, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सूचनांमधून पुढे आले. या ३ गोष्टींवर पालिकेने व्यवस्थित काम केले, तर पुणे शहर आपोआपच स्मार्ट सिटी होईल,असे मत या सर्वांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी व अमृत अभियान योजनेची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने यशदा येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे तसेच स्मार्ट सिटी योजनेचे दिल्ली येथील तांत्रिक अधिकारी मेहताब या वेळी व्यासपीठावर होते. बहुसंख्य नगरसेवकांनी या वेळी शहर स्मार्ट होण्यासाठी महापालिकेने कचरा, सार्वजनिक वाहतूक व पाण्याचा पुनर्वापर याव्ांर नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांबरोबरच मनपा अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनीही शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर टीका करून तीत सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यशाळेच्या सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या, तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या काही योजनांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल, त्यासाठीच्या अटी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला काय करावे लागेल, याविषयी त्यांनी सांगितले. त्यानंतर या योजनेचे केंद्रातील अधिकारी मेहताब यांनी स्मार्ट सिटी व अमृत योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी देशातून फक्त १०० शहरांची निवड करण्यात येणार असून, त्यांत महाराष्ट्रातील १० शहरे आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय याबरोबरच केंद्र सरकारच्या या योजनेतून कशा प्रकारची मदत मिळेल, त्यासाठी कोणत्या अटी व नियम आहेत, याबाबत मेहताब यांनी सांगितले.पुणे शहर स्मार्ट होतेच; मात्र लोकसंख्यावाढीला अनुसरून नागरी सुविधा देण्यात मनपाला अपयश आल्यामुळेच ते आता बकाल होत चालले आहे, अशी टीका विशाल तांबे, अविनाश बागवे यांनी केली. वनिता वागस्कर यांनी विकास आराखड्याचे काय झाले, त्यातील अनेक गोष्टी स्मार्ट सिटी योजनेत घेता येतील, असे सुचवले. स्मार्ट शहरातील वाहतूकही स्मार्ट हवी, त्यासाठी काय उपाय करणार ते सांगा, अशी मागणी पुष्पा कनोजिया यांनी केली. माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्यांचा रंग बदलला तरी शहर स्मार्ट दिसेल, अशी टीका केली. माधुरी सहस्रबुद्धे, मीनल सरोदे, कैलास गायकवाड, विकास दागंट, किशोर शिंदे आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला व विविध सूचना केल्या. गटनेते गणेश बिडकर, बाबू वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे यांनीही मत व्यक्त केले. उपमहापौर आबा बागुल यांनी केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत पुणे शहराचा समावेश झाला पाहिजेत, अशा पद्धतीने आपली प्रवेशिका प्रशासनाने दाखल करावी, अशी सूचना केली. म्महापौर धनकवडे यांनी कार्यशाळेचा समारोप केला. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.