शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

‘स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांचे टीकास्त्र

By admin | Updated: July 21, 2015 09:11 IST

शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या

पुणे : शहर स्मार्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या मूलभूत प्रश्नांवर पुणे महापालिकेच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र नगरसेवक, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सूचनांमधून पुढे आले. या ३ गोष्टींवर पालिकेने व्यवस्थित काम केले, तर पुणे शहर आपोआपच स्मार्ट सिटी होईल,असे मत या सर्वांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी व अमृत अभियान योजनेची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने यशदा येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे तसेच स्मार्ट सिटी योजनेचे दिल्ली येथील तांत्रिक अधिकारी मेहताब या वेळी व्यासपीठावर होते. बहुसंख्य नगरसेवकांनी या वेळी शहर स्मार्ट होण्यासाठी महापालिकेने कचरा, सार्वजनिक वाहतूक व पाण्याचा पुनर्वापर याव्ांर नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांबरोबरच मनपा अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनीही शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर टीका करून तीत सुधारणा होण्याची गरज असल्याचे सांगितले.कार्यशाळेच्या सुरुवातीला आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या, तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या काही योजनांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल, त्यासाठीच्या अटी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला काय करावे लागेल, याविषयी त्यांनी सांगितले. त्यानंतर या योजनेचे केंद्रातील अधिकारी मेहताब यांनी स्मार्ट सिटी व अमृत योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेसाठी देशातून फक्त १०० शहरांची निवड करण्यात येणार असून, त्यांत महाराष्ट्रातील १० शहरे आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय याबरोबरच केंद्र सरकारच्या या योजनेतून कशा प्रकारची मदत मिळेल, त्यासाठी कोणत्या अटी व नियम आहेत, याबाबत मेहताब यांनी सांगितले.पुणे शहर स्मार्ट होतेच; मात्र लोकसंख्यावाढीला अनुसरून नागरी सुविधा देण्यात मनपाला अपयश आल्यामुळेच ते आता बकाल होत चालले आहे, अशी टीका विशाल तांबे, अविनाश बागवे यांनी केली. वनिता वागस्कर यांनी विकास आराखड्याचे काय झाले, त्यातील अनेक गोष्टी स्मार्ट सिटी योजनेत घेता येतील, असे सुचवले. स्मार्ट शहरातील वाहतूकही स्मार्ट हवी, त्यासाठी काय उपाय करणार ते सांगा, अशी मागणी पुष्पा कनोजिया यांनी केली. माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्यांचा रंग बदलला तरी शहर स्मार्ट दिसेल, अशी टीका केली. माधुरी सहस्रबुद्धे, मीनल सरोदे, कैलास गायकवाड, विकास दागंट, किशोर शिंदे आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला व विविध सूचना केल्या. गटनेते गणेश बिडकर, बाबू वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे यांनीही मत व्यक्त केले. उपमहापौर आबा बागुल यांनी केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत पुणे शहराचा समावेश झाला पाहिजेत, अशा पद्धतीने आपली प्रवेशिका प्रशासनाने दाखल करावी, अशी सूचना केली. म्महापौर धनकवडे यांनी कार्यशाळेचा समारोप केला. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.