शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या चळवळींचे आज काय झाले, याचा शोध घेतला पाहिजे. भटक्या समाजाला गाव नाही तर पाणवठा कसा असणार, कोरोनाकाळात या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान काय आहे, कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का? असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी उपस्थित केला.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, राष्ट्र सेवा दल, ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निर्माण पुणे यांच्या वतीने राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजित भटके विमुक्तांच्या प्रश्नांच्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी फाउंडेशनचे सुभाष वारे, भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी अध्यक्षस्थानी होते.

शोषित समाजातील शिकलेले लोक मध्यमवर्गासारखे वागू लागतात. समाजाच्या प्रगतीसाठी ते मागे वळून पाहत नाहीत. आत्मनिर्भर भारतातील हे समाज आत्मनिर्भर कधी होणार? असा प्रश्न देखील बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

वारे म्हणाले, महिलांवर समाजातील लोकांकडून आणि इतर समाजाकडून अत्याचार होतात. सांस्कृतिक प्रतिमा ठळक करण्यासाठी सुरू केलेल्या अस्मितांच्या लढाया या शोषित समाजासाठी मारक ठरत आहेत. आपआपसातील लढाईमुळे शत्रूपर्यंत आपण पोहचू शकलेलो नाही. इतरांचे अधिकार मिळवण्यासाठी मूल्यव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. वाड्या, वस्ती आणि तांड्यापर्यंत संविधान पोहचू शकलेले नाही. काही शक्ती संविधान तोडायला निघाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आणि अधिकाराची लढाई लढत राहिली पाहिजे.

डॉ. गणेश देवी म्हणाले, ऐतिहासिक घटनांचा सूड घेणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वेडेपणा आहे. बाबराचा असो किंवा ब्रिटिशांचाही सूड हा आत्ता घ्यायचा नाही. उलट बुद्ध आणि गांधींच्या देशातील क्षमाशील लोक ब्रिटिशांना क्षमा करतील. मनूचा आणि गुन्हेगारी जमातीचा कायदा करणाऱ्या मायोचा पुतळा हटवला पाहिजे तसेच मागासवर्गीय समाजासाठी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आर्थिक तरतुदीच्या सल्लाप्रमाणे भटके समाजाचाही विचार झाला झाला पाहिजे.

संतोष जाधव यांनी स्वागत केले. नारायण जावलीकर यांनी सूत्रसंचालन केले.