शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या चळवळींचे आज काय झाले, याचा शोध घेतला पाहिजे. भटक्या समाजाला गाव नाही तर पाणवठा कसा असणार, कोरोनाकाळात या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान काय आहे, कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का? असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी उपस्थित केला.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, राष्ट्र सेवा दल, ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निर्माण पुणे यांच्या वतीने राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजित भटके विमुक्तांच्या प्रश्नांच्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी फाउंडेशनचे सुभाष वारे, भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी अध्यक्षस्थानी होते.

शोषित समाजातील शिकलेले लोक मध्यमवर्गासारखे वागू लागतात. समाजाच्या प्रगतीसाठी ते मागे वळून पाहत नाहीत. आत्मनिर्भर भारतातील हे समाज आत्मनिर्भर कधी होणार? असा प्रश्न देखील बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

वारे म्हणाले, महिलांवर समाजातील लोकांकडून आणि इतर समाजाकडून अत्याचार होतात. सांस्कृतिक प्रतिमा ठळक करण्यासाठी सुरू केलेल्या अस्मितांच्या लढाया या शोषित समाजासाठी मारक ठरत आहेत. आपआपसातील लढाईमुळे शत्रूपर्यंत आपण पोहचू शकलेलो नाही. इतरांचे अधिकार मिळवण्यासाठी मूल्यव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. वाड्या, वस्ती आणि तांड्यापर्यंत संविधान पोहचू शकलेले नाही. काही शक्ती संविधान तोडायला निघाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आणि अधिकाराची लढाई लढत राहिली पाहिजे.

डॉ. गणेश देवी म्हणाले, ऐतिहासिक घटनांचा सूड घेणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वेडेपणा आहे. बाबराचा असो किंवा ब्रिटिशांचाही सूड हा आत्ता घ्यायचा नाही. उलट बुद्ध आणि गांधींच्या देशातील क्षमाशील लोक ब्रिटिशांना क्षमा करतील. मनूचा आणि गुन्हेगारी जमातीचा कायदा करणाऱ्या मायोचा पुतळा हटवला पाहिजे तसेच मागासवर्गीय समाजासाठी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आर्थिक तरतुदीच्या सल्लाप्रमाणे भटके समाजाचाही विचार झाला झाला पाहिजे.

संतोष जाधव यांनी स्वागत केले. नारायण जावलीकर यांनी सूत्रसंचालन केले.