शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळींना अजेंडा देण्यात आपण कमी पडलो आहोत. या चळवळींचे आज काय झाले, याचा शोध घेतला पाहिजे. भटक्या समाजाला गाव नाही तर पाणवठा कसा असणार, कोरोनाकाळात या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान काय आहे, कोरोनावर लस येईल; पण भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का? असा सवाल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी उपस्थित केला.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, राष्ट्र सेवा दल, ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निर्माण पुणे यांच्या वतीने राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे आयोजित भटके विमुक्तांच्या प्रश्नांच्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी फाउंडेशनचे सुभाष वारे, भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी अध्यक्षस्थानी होते.

शोषित समाजातील शिकलेले लोक मध्यमवर्गासारखे वागू लागतात. समाजाच्या प्रगतीसाठी ते मागे वळून पाहत नाहीत. आत्मनिर्भर भारतातील हे समाज आत्मनिर्भर कधी होणार? असा प्रश्न देखील बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

वारे म्हणाले, महिलांवर समाजातील लोकांकडून आणि इतर समाजाकडून अत्याचार होतात. सांस्कृतिक प्रतिमा ठळक करण्यासाठी सुरू केलेल्या अस्मितांच्या लढाया या शोषित समाजासाठी मारक ठरत आहेत. आपआपसातील लढाईमुळे शत्रूपर्यंत आपण पोहचू शकलेलो नाही. इतरांचे अधिकार मिळवण्यासाठी मूल्यव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. वाड्या, वस्ती आणि तांड्यापर्यंत संविधान पोहचू शकलेले नाही. काही शक्ती संविधान तोडायला निघाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आणि अधिकाराची लढाई लढत राहिली पाहिजे.

डॉ. गणेश देवी म्हणाले, ऐतिहासिक घटनांचा सूड घेणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वेडेपणा आहे. बाबराचा असो किंवा ब्रिटिशांचाही सूड हा आत्ता घ्यायचा नाही. उलट बुद्ध आणि गांधींच्या देशातील क्षमाशील लोक ब्रिटिशांना क्षमा करतील. मनूचा आणि गुन्हेगारी जमातीचा कायदा करणाऱ्या मायोचा पुतळा हटवला पाहिजे तसेच मागासवर्गीय समाजासाठी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आर्थिक तरतुदीच्या सल्लाप्रमाणे भटके समाजाचाही विचार झाला झाला पाहिजे.

संतोष जाधव यांनी स्वागत केले. नारायण जावलीकर यांनी सूत्रसंचालन केले.