शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणी ते रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत...मनस्ताप आणि मनस्तापच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:11 IST

पुण्यातील अनेकांना हा अनुभव आला असेल. प्रशासन किंवा रुग्णालयांवर दोषारोप करण्याचा हेतू नसला तरी सामान्य माणूस काय भोगतोय याबाबत ...

पुण्यातील अनेकांना हा अनुभव आला असेल. प्रशासन किंवा रुग्णालयांवर दोषारोप करण्याचा हेतू नसला तरी सामान्य माणूस काय भोगतोय याबाबत गांभीर्याने विचार करून नागरिकांना माहिती देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

प्रवास कोरोना चाचणी ते रुग्णालयांपर्यंतचा...एका मुलाचा अनुभव

८ एप्रिल : संध्याकाळी वडिलांना अचानक चक्कर आली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी पल्स आणि बीपी चेक केल्यावर कोरोनाची तपासणी करायला सांगितली. तोपर्यंत वडिलांना खूपच अशक्तपणा जाणवायला लागला होता.

१० एप्रिल : शनिवारचा दिवस होता. मी सकाळपासूनच लॅबमध्ये नंबर लावून ठेवला. पण ते आल्यावर म्हणाले, आम्ही घरी येऊन चेक करू शकणार नाही. आमच्याकडे चेक करायचे किट संपले आहेत. फक्त ४ किट आहेत. ते संपवून लॅब बंद करणार आहोत. खूप विनवणी केल्यावर त्यांनी माझ्या आई-वडिलासाठी २ किट बाजूला काढून ठेवले. मी क्षणाचाही विलंब न करता घरी जाऊन आई आणि वडिलांना तेथे घेऊन आलो आणि त्यांची टेस्ट करून घेतली. शनिवारी केलेल्या तपासणीचा रिपोर्ट सोमवारी मिळणार होता. त्यामुळे मी दोघांना घेऊन घरी आलो.

११ एप्रिल : घरी आल्यावर वडिलांना जाणवणारा अशक्तपणा हळूहळू वाढतच होता. सोमवारची वाट बघता कसाबसा रविवार गेला. लॅबने दिलेल्या नंबरवर एकसारखे फोन करत होतो; परंतु कोणीही फोन उचलत नव्हते.

१२-१३ एप्रिल: सोमवार गेला. मंगळवारही असाच गेला. इकडे वडिलांची तब्येत खराब होत होती.

१४ एप्रिल : बुधवारी सकाळी लॅबच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. पण तरीही रिपोर्ट आला नव्हता. पूर्ण २ तास तिथे बसूनच वाट बघितली. शेवटी तेथील कर्मचाऱ्याला माझी दया आली. ते म्हणाले, तुम्ही जा. मी रिपोर्ट आला की मोबाईलवर पाठवते. आश्वासन घेऊन मी निघालो. परंतु तरीही मनात तीच गुंतागुंत होती की, रिपोर्ट मिळाल्याशिवाय कोणीच ॲडमिट करणार नाही. शेवटी बुधवारी संध्याकाळी वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सिटी स्कॅन केला. त्याचा रिपोर्टसुद्धा आला आणि माझी धावपळ सुरू झाली. बुधवारी रात्री जास्त त्रास व्हायला लागला म्ह्णून ओळखीच्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांना थेट रुबी हॉस्पिटलला घेऊन गेलो. पण तेथील परिस्थिती फारच गंभीर होती. वडिलांना घेऊन गेलो, पण तेथे एकही बेड रिकामा नव्हता. त्यामुळे त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. बाहेर लोकांना ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत आणि त्यांना होणार त्रास बघून तोपर्यंत वडील खूप घाबरले होते. त्यांचा त्रास हळूहळू वाढतच होता. काय करावे, कुठे घेऊन जावे, काहीच कळत नव्हते. माझे दोघे भाऊ, माझा मित्र मनोज सगळे जण सगळीकडे फोन करत होते. दवाखान्यात विचारपूस करत होते. परंतु कोठेही बेड मिळत नव्हता. शेवटी भावाच्या एका फोनला सकारात्मक उत्तर मिळाले आणि आम्ही वडिलांना सहारा हॉस्पिटल, दांडेकर पूल येथे घेऊन गेलो. डॉक्टर साहेबांनी खाली येऊन त्यांना चेक केले तर त्यांची ऑक्सिजनची पातळी खूपच खाली गेली होती. खूप विनंती केल्यावर त्यांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि उपचार सुरू केले.

१५ एप्रिल : पहिल्या दिवशी रेमेडिसिविर दिले; परंतु अजूनही ४ ची आवश्यकता होती. सर्वांना कॉल केले, मेसेज केले आणि खूप धावपळ करून मित्रांच्या मेहनतीने कुठून कुठून ४ रेमेडिसिवर इंजेक्शन मिळवले. तेव्हा वाटले होते की आता सगळं व्यवस्थित होईल, परंतु नाही.

२० एप्रिल : २० एप्रिलच्या रात्री डॉक्टरांचा साहेबांचं फोन आला की वडिलांना ऑक्सिजन जास्त लागत आहे. आणि आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. ऐनवेळी ऑक्सिजनअभावी काही समस्या नको म्हणून त्यांना दुसऱ्या दवाखान्यात ॲडमिट करायला सांगितले. त्यादिवशी संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा होता. बाहेरच्या परिस्थितीबद्दल स्वतः डॉक्टर ही परिचित होते. बाहेर बेड मिळवणे अशक्य होते. त्यांनी खूप धावपळ करून कशेबशे ऑक्सिजन सिलिंडर मिळवले आणि ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत झाला.

आजही धावपळच : अजूनही वडिलांना ऑक्सिजनचा त्रास होतच आहे. त्यांची लेव्हल कमीच आहे. डॉक्टर म्हणत आहेत की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. मी गेली दोन दिवस त्यासाठी वणवण फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी निराशा हाती येत आहे. कुठेही व्हेंटिलेटर पलंग नाहीत. काही ठिकाणी जाऊन वेटिंग लिस्टमध्ये नंबर लावून आलो आहे. माझा हा प्रवास अजूनही अपूर्णच आहे. जेव्हा वडिलांना बरे वाटेल आणि ते सुखरूप घरी येतील तेव्हाच मी ही लढाई जिंकली असे म्हणेल.