शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची ...

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेला मज्जाव, साखरेच्या पातळीचे संतुलन, फुप्फुसांची कार्यक्षमता अशा विविध निकषांचा विचार केला जातो. नियोजित शस्त्रक्रिया किमान दोन-तीन महिने लांबणीवर टाकण्याचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो. कोरोनानंतरच्या या आजारांवर शस्त्रक्रिया कधी करायच्या? त्यामुळे त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या लक्षणांवर पोस्ट कोविड त्रास अवलंबून असतो. काही रुग्णांमध्ये ‘लाँग कोविड’ची लक्षणे दिसून येतात. यामध्ये झोपेचा पॅटर्न बदलणे, लवकर थकवा येणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, हाडांचा ठिसूळपणा असे अनेक त्रास दिसून येतात. कोरोना होऊन गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही कमी झालेली असते. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया काही दिवसांनी करण्यावर भर दिला जातो. मात्र, पोटाची, हृदयाची तातडीची शस्त्रक्रिया किंवा प्रोसिजर, फ्रॅक्चर किंवा अपघात झाल्यास कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य नसते. अशा वेळी रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून, औषधोपचारांची दिशा ठरवून शस्त्रक्रिया केल्या जातात.

--------------------

अनेक रुग्णांमध्ये पोस्टकोविड लक्षणे बराच काळपर्यंत दिसून येतात. शस्त्रक्रियेची निकड लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जातो. एखादे हाड फ्रॅक्चर होणे, अँपेडिक्स, अँजिओप्लास्टी, पोटाची तातडीची शस्त्रक्रिया अशा इमर्जन्सी केसमध्ये वाट पाहणे शक्य नसते. गुडघ्याचे प्रत्यारोपण, गॉल ब्लॅडर, हर्निया, मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया काही काळाने करता येऊ शकतात.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र

----------------

कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना त्याला कोरोना होऊन गेला आहे का, लसीचा एक किंवा दोन डोस झाले आहेत का, शस्त्रक्रिया किती तातडीची आहे या निकषांचा अभ्यास केला जातो. तातडीची शस्त्रक्रिया करताना आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत थांबणे शक्य नसते. अशा वेळी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी २डी किंवा ३डी एको, ईसीजी या चाचण्या केल्या जातात, ऑक्सिजनची पातळी, साखरेची पातळी, रक्तदाब यांची तपासणी केली जाते.

- डॉ. अच्युत जोशी, नेफ्रॉलॉजिस्ट

--------------------------

हृदयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्याची किंवा रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया थांबवण्याची गोळी नियमितपणे सुरू असते. तातडीच्या शस्त्रक्रियेच्या किमान पाच दिवस आधी गोळी बंद करावी लागते. त्याचप्रमाणे, शस्त्रक्रिया झाल्यावर रक्तस्राव थांबेपर्यंत गोळी पुन्हा सुरू करता येत नाही. अशा वेळी रक्ताची गुठळी होण्याची जोखीम वाढते. अशा वेळी शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीपर्यंत अँटिकॉग्युलंट इंजेक्शन देता येतात. रक्तातील डी-डायमर, सीआरपी आणि केरेटिन हे मार्कर रक्त घट्ट होण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात. नियोजित शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यापर्यंत लांबणीवर टाकता येऊ शकतात.

- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ