शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी, संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची ...

पुणे : कोरोनाचा तीव्र संसर्ग होऊन गेल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील तीन-सहा महिन्यांपर्यंत कोरोनापश्चात लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेला मज्जाव, साखरेच्या पातळीचे संतुलन, फुप्फुसांची कार्यक्षमता अशा विविध निकषांचा विचार केला जातो. नियोजित शस्त्रक्रिया किमान दोन-तीन महिने लांबणीवर टाकण्याचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो. कोरोनानंतरच्या या आजारांवर शस्त्रक्रिया कधी करायच्या? त्यामुळे त्यांच्यात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या लक्षणांवर पोस्ट कोविड त्रास अवलंबून असतो. काही रुग्णांमध्ये ‘लाँग कोविड’ची लक्षणे दिसून येतात. यामध्ये झोपेचा पॅटर्न बदलणे, लवकर थकवा येणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, हाडांचा ठिसूळपणा असे अनेक त्रास दिसून येतात. कोरोना होऊन गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही कमी झालेली असते. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया काही दिवसांनी करण्यावर भर दिला जातो. मात्र, पोटाची, हृदयाची तातडीची शस्त्रक्रिया किंवा प्रोसिजर, फ्रॅक्चर किंवा अपघात झाल्यास कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य नसते. अशा वेळी रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून, औषधोपचारांची दिशा ठरवून शस्त्रक्रिया केल्या जातात.

--------------------

अनेक रुग्णांमध्ये पोस्टकोविड लक्षणे बराच काळपर्यंत दिसून येतात. शस्त्रक्रियेची निकड लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जातो. एखादे हाड फ्रॅक्चर होणे, अँपेडिक्स, अँजिओप्लास्टी, पोटाची तातडीची शस्त्रक्रिया अशा इमर्जन्सी केसमध्ये वाट पाहणे शक्य नसते. गुडघ्याचे प्रत्यारोपण, गॉल ब्लॅडर, हर्निया, मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया काही काळाने करता येऊ शकतात.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र

----------------

कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना त्याला कोरोना होऊन गेला आहे का, लसीचा एक किंवा दोन डोस झाले आहेत का, शस्त्रक्रिया किती तातडीची आहे या निकषांचा अभ्यास केला जातो. तातडीची शस्त्रक्रिया करताना आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल येईपर्यंत थांबणे शक्य नसते. अशा वेळी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी २डी किंवा ३डी एको, ईसीजी या चाचण्या केल्या जातात, ऑक्सिजनची पातळी, साखरेची पातळी, रक्तदाब यांची तपासणी केली जाते.

- डॉ. अच्युत जोशी, नेफ्रॉलॉजिस्ट

--------------------------

हृदयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्याची किंवा रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया थांबवण्याची गोळी नियमितपणे सुरू असते. तातडीच्या शस्त्रक्रियेच्या किमान पाच दिवस आधी गोळी बंद करावी लागते. त्याचप्रमाणे, शस्त्रक्रिया झाल्यावर रक्तस्राव थांबेपर्यंत गोळी पुन्हा सुरू करता येत नाही. अशा वेळी रक्ताची गुठळी होण्याची जोखीम वाढते. अशा वेळी शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीपर्यंत अँटिकॉग्युलंट इंजेक्शन देता येतात. रक्तातील डी-डायमर, सीआरपी आणि केरेटिन हे मार्कर रक्त घट्ट होण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात. नियोजित शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यापर्यंत लांबणीवर टाकता येऊ शकतात.

- डॉ. अभिजित वैद्य, हृदयरोगतज्ज्ञ