शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींमध्ये लसीकरणावरून असलेला वाद नागरिकांच्या जिवाशी, नागरिकांना पायपीट, भरउन्हात उभे राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून ...

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून वेटिंगसाठी भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर ऑब्झर्वेशनसाठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफसाठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंगसाठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधीच्या वादातून हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटीमध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार झाला. आपण नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे भानही लोकप्रतिनिधींना राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या या वादाला अधिकारीही बळी पडत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज हजारो रुग्ण तपासणी आणि उपचासाठी येत असून लसीकरण केंद्र येथे हलविल्यामुळे गर्दीत वाढ झाली असून. शिवाय, रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येत आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी वाढण्याची शक्यता आहे

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना ऑब्झर्वेशनसाठी बसण्याचीही जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वेटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याच जागेत छोटा मांडव टाकण्यात आला आहे. यामुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चारचाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून तेथून चालत आणण्याची कसरत करावी लागत आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने भर पुणे-नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.

आयसीएमआरच्या नियमानुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे, त्याच जागेत सेंटर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ते तेथे हलविले. बी. जे. एस. येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल, असे ही ते म्हणाले