शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

लोकप्रतिनिधींमध्ये लसीकरणावरून असलेला वाद नागरिकांच्या जिवाशी, नागरिकांना पायपीट, भरउन्हात उभे राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून ...

वाघोली येथील बी.जे.एस. हायस्कूल येथील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले असून वेटिंगसाठी भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर ऑब्झर्वेशनसाठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफसाठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंगसाठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधीच्या वादातून हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटीमध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार झाला. आपण नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे भानही लोकप्रतिनिधींना राहिले नाही. लोकप्रतिनिधींच्या या वादाला अधिकारीही बळी पडत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज हजारो रुग्ण तपासणी आणि उपचासाठी येत असून लसीकरण केंद्र येथे हलविल्यामुळे गर्दीत वाढ झाली असून. शिवाय, रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येत आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी वाढण्याची शक्यता आहे

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना ऑब्झर्वेशनसाठी बसण्याचीही जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वेटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याच जागेत छोटा मांडव टाकण्यात आला आहे. यामुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चारचाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून तेथून चालत आणण्याची कसरत करावी लागत आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने भर पुणे-नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.

आयसीएमआरच्या नियमानुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे, त्याच जागेत सेंटर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ते तेथे हलविले. बी. जे. एस. येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल, असे ही ते म्हणाले