शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 29, 2017 01:50 IST

लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या

राजेंद्र मांजरे/ लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या पाण्यात विहिरीचे शुद्ध न केलेले पाणी मिसळून थेट राजगुरुनगर शहराला ते वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना करूनही, शहराला पुरेसे आणि शुद्ध पाणी देण्यात नियोजनाअभावी नगर परिषद प्रशासनाला अपयश येत आहे. यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जुनी पाणी योजना कुचकामी झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ८८ लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्राचे कामही गेल्या वर्षी करण्यात आले होते. या जलशुद्धी केंद्रातून दररोज ३.५ एमएलडी म्हणजे ३५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या १५ अश्वशक्तीच्या मोटारींऐवजी ३० अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी बसविण्यात आल्या होत्या. या केंद्रापासून वाड्या-वस्त्यांच्या पाण्याच्या टाकीपर्यंत एकूण ७०० मीटर लांबीची आणि ८ इंची जाडीची बिडाची पाइपलाइन टाकण्यात आली होती. या कामासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. बंधाऱ्यातील गाळ आणि वाळूही उपसली होती. एवढे सगळे करूनही काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना कमी दाबाने व दिवसाआड पाणी सोडले जात आहे. राक्षेवाडीचा काही परिसर, पाबळ रोड, पडाळवाडी येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गळती थांबविण्यासाठी ३५ लाख रुपये निधी दिला होता. व्हॉल्व्ह व इतर साहित्य घेण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही गेले तरी घेतलेले साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामधील व्हॉल्व्ह व पाइप निकामी झाले आहेत. बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे दूषित होत आहे. व्हॉल्व्ह झाले नादुरुस्त : पाण्याचा अपव्ययगेल्या काही दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या पाण्यात नदीचे पाणी मिसळून नागरिकांना ते वितरित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी शहरातील ६५ हजार नागरिकांना वितरित केले जाते. पालकमंत्र्यांनी ३५ लाख रुपये निधी देऊन शहरात गेल्या वर्षापासून ठिकठिकाणी पाण्याचे वॉल बसविण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. शहराला १० लाख लिटर जास्तीच्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ते उपलब्ध होत नाही. ३० लाख लिटर पाणी शुद्धीकरण व ३० लाख लिटर नदीलगतच्या विहिरीतील शुद्ध न केलेले पाणी एकत्र मिसळून राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा होत आहे. - शिवाजी मांदळे (नगरसेवक, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहरात वॉल बसविण्याचे काम अपूर्ण आहे. ते काम लवकरच हाती घेणार असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे काम हाती घेतल्यास चार-पाच दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहील. त्यामुळे नागरिकांचे हाल नकोत, म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वॉल बसविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केलेलेच पाणी शहरातील नागरिकांना पुरविण्यात येते. तसेच बऱ्याच वेळा विजेचा अनियमित असल्यामुळे दिवसाआड पाणी दिले जाते. शुद्ध न केलेले पाणी मिसळत नाही. - सचिन सहस्रबुद्धे (मुख्यधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहराला पाणी खराब येते, पण घरात पाण्याचे पाणी शुद्धीकरण यंत्र असल्यामुळे ते लक्षात येत नाही. शहरासाठी कडूस प्रादेशिक पाणीपुरवठा फायद्याची आहे. शहराला जेवढे जलशुद्धीकरण केलेले पाणी लागते ते नगर परिषद देऊ शकत नाही. नगर परिषद फक्त पाणीपुरवठा योजनेची वरवरची डागडुजी करून मलमपट्टी करीत आहे. - ऊर्मिला सांडभोर (नागरिक राजगुरुनगर)