शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 29, 2017 01:50 IST

लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या

राजेंद्र मांजरे/ लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या पाण्यात विहिरीचे शुद्ध न केलेले पाणी मिसळून थेट राजगुरुनगर शहराला ते वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना करूनही, शहराला पुरेसे आणि शुद्ध पाणी देण्यात नियोजनाअभावी नगर परिषद प्रशासनाला अपयश येत आहे. यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जुनी पाणी योजना कुचकामी झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ८८ लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्राचे कामही गेल्या वर्षी करण्यात आले होते. या जलशुद्धी केंद्रातून दररोज ३.५ एमएलडी म्हणजे ३५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या १५ अश्वशक्तीच्या मोटारींऐवजी ३० अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी बसविण्यात आल्या होत्या. या केंद्रापासून वाड्या-वस्त्यांच्या पाण्याच्या टाकीपर्यंत एकूण ७०० मीटर लांबीची आणि ८ इंची जाडीची बिडाची पाइपलाइन टाकण्यात आली होती. या कामासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. बंधाऱ्यातील गाळ आणि वाळूही उपसली होती. एवढे सगळे करूनही काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना कमी दाबाने व दिवसाआड पाणी सोडले जात आहे. राक्षेवाडीचा काही परिसर, पाबळ रोड, पडाळवाडी येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गळती थांबविण्यासाठी ३५ लाख रुपये निधी दिला होता. व्हॉल्व्ह व इतर साहित्य घेण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही गेले तरी घेतलेले साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामधील व्हॉल्व्ह व पाइप निकामी झाले आहेत. बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे दूषित होत आहे. व्हॉल्व्ह झाले नादुरुस्त : पाण्याचा अपव्ययगेल्या काही दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या पाण्यात नदीचे पाणी मिसळून नागरिकांना ते वितरित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी शहरातील ६५ हजार नागरिकांना वितरित केले जाते. पालकमंत्र्यांनी ३५ लाख रुपये निधी देऊन शहरात गेल्या वर्षापासून ठिकठिकाणी पाण्याचे वॉल बसविण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. शहराला १० लाख लिटर जास्तीच्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ते उपलब्ध होत नाही. ३० लाख लिटर पाणी शुद्धीकरण व ३० लाख लिटर नदीलगतच्या विहिरीतील शुद्ध न केलेले पाणी एकत्र मिसळून राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा होत आहे. - शिवाजी मांदळे (नगरसेवक, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहरात वॉल बसविण्याचे काम अपूर्ण आहे. ते काम लवकरच हाती घेणार असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे काम हाती घेतल्यास चार-पाच दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहील. त्यामुळे नागरिकांचे हाल नकोत, म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वॉल बसविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केलेलेच पाणी शहरातील नागरिकांना पुरविण्यात येते. तसेच बऱ्याच वेळा विजेचा अनियमित असल्यामुळे दिवसाआड पाणी दिले जाते. शुद्ध न केलेले पाणी मिसळत नाही. - सचिन सहस्रबुद्धे (मुख्यधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहराला पाणी खराब येते, पण घरात पाण्याचे पाणी शुद्धीकरण यंत्र असल्यामुळे ते लक्षात येत नाही. शहरासाठी कडूस प्रादेशिक पाणीपुरवठा फायद्याची आहे. शहराला जेवढे जलशुद्धीकरण केलेले पाणी लागते ते नगर परिषद देऊ शकत नाही. नगर परिषद फक्त पाणीपुरवठा योजनेची वरवरची डागडुजी करून मलमपट्टी करीत आहे. - ऊर्मिला सांडभोर (नागरिक राजगुरुनगर)