शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 29, 2017 01:50 IST

लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या

राजेंद्र मांजरे/ लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या पाण्यात विहिरीचे शुद्ध न केलेले पाणी मिसळून थेट राजगुरुनगर शहराला ते वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजगुरुनगर नगर परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना करूनही, शहराला पुरेसे आणि शुद्ध पाणी देण्यात नियोजनाअभावी नगर परिषद प्रशासनाला अपयश येत आहे. यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जुनी पाणी योजना कुचकामी झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ८८ लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्राचे कामही गेल्या वर्षी करण्यात आले होते. या जलशुद्धी केंद्रातून दररोज ३.५ एमएलडी म्हणजे ३५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या १५ अश्वशक्तीच्या मोटारींऐवजी ३० अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी बसविण्यात आल्या होत्या. या केंद्रापासून वाड्या-वस्त्यांच्या पाण्याच्या टाकीपर्यंत एकूण ७०० मीटर लांबीची आणि ८ इंची जाडीची बिडाची पाइपलाइन टाकण्यात आली होती. या कामासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. बंधाऱ्यातील गाळ आणि वाळूही उपसली होती. एवढे सगळे करूनही काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना कमी दाबाने व दिवसाआड पाणी सोडले जात आहे. राक्षेवाडीचा काही परिसर, पाबळ रोड, पडाळवाडी येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गळती थांबविण्यासाठी ३५ लाख रुपये निधी दिला होता. व्हॉल्व्ह व इतर साहित्य घेण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही गेले तरी घेतलेले साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामधील व्हॉल्व्ह व पाइप निकामी झाले आहेत. बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे दूषित होत आहे. व्हॉल्व्ह झाले नादुरुस्त : पाण्याचा अपव्ययगेल्या काही दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या पाण्यात नदीचे पाणी मिसळून नागरिकांना ते वितरित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी शहरातील ६५ हजार नागरिकांना वितरित केले जाते. पालकमंत्र्यांनी ३५ लाख रुपये निधी देऊन शहरात गेल्या वर्षापासून ठिकठिकाणी पाण्याचे वॉल बसविण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. शहराला १० लाख लिटर जास्तीच्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ते उपलब्ध होत नाही. ३० लाख लिटर पाणी शुद्धीकरण व ३० लाख लिटर नदीलगतच्या विहिरीतील शुद्ध न केलेले पाणी एकत्र मिसळून राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा होत आहे. - शिवाजी मांदळे (नगरसेवक, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहरात वॉल बसविण्याचे काम अपूर्ण आहे. ते काम लवकरच हाती घेणार असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे काम हाती घेतल्यास चार-पाच दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहील. त्यामुळे नागरिकांचे हाल नकोत, म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वॉल बसविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केलेलेच पाणी शहरातील नागरिकांना पुरविण्यात येते. तसेच बऱ्याच वेळा विजेचा अनियमित असल्यामुळे दिवसाआड पाणी दिले जाते. शुद्ध न केलेले पाणी मिसळत नाही. - सचिन सहस्रबुद्धे (मुख्यधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद)राजगुरुनगर शहराला पाणी खराब येते, पण घरात पाण्याचे पाणी शुद्धीकरण यंत्र असल्यामुळे ते लक्षात येत नाही. शहरासाठी कडूस प्रादेशिक पाणीपुरवठा फायद्याची आहे. शहराला जेवढे जलशुद्धीकरण केलेले पाणी लागते ते नगर परिषद देऊ शकत नाही. नगर परिषद फक्त पाणीपुरवठा योजनेची वरवरची डागडुजी करून मलमपट्टी करीत आहे. - ऊर्मिला सांडभोर (नागरिक राजगुरुनगर)