शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पूर रोखण्यासाठी पात्र सरळ करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST

पुणे : शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या आंबील ओढ्यालगतच्या झोपड्या पालिका प्रशासनाने हलविण्यास सुरुवात केली आहे. यावरून मोठा वादंग निर्माण ...

पुणे : शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या आंबील ओढ्यालगतच्या झोपड्या पालिका प्रशासनाने हलविण्यास सुरुवात केली आहे. यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी ओढा अर्धवर्तुळाकार झाला असून त्याची लांबी अंदाजे २९५ मीटर आहे. सध्या अस्तित्वातील नाल्याचा प्रवाह अर्धवर्तुळाकार फिरून पुढे जात असल्याने पाण्याचा फुगवटा तयार होऊन पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नगररचना आणि विकास आराखड्यातील नकाशानुसार प्रवाह सरळ केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होऊन पुराचा धोका टळणार असल्याचा पालिकेचा निष्कर्ष आहे.

शहरात मागील दोन वर्षांपासून अचानकपणे ढगफुटीसारखा पाऊस पडून आंबिल ओढ्याला पूर येत आहे. ओढ्यालगत राहणाऱ्या काही नागरिकांना जीवही गमवावे लागले आहेत, तर अनेकांचे संसार अद्यापही सावरलेले नाहीत. पाण्याचा फुगवठा जास्त प्रमाणात होत असलेल्या भागातील प्रवाह सरळ करण्याबाबतच्या ठरावाला पालिका आयुक्तांनी मागील वर्षी मान्यता दिलेली आहे.

नगररचनेच्या नकाशानुसार ओढ्याचा प्रवाह सरळ दर्शविलेला असून, त्याची रुंदी अंदाजे ५० फूट व अंदाजे लांबी १५० मीटर दर्शविण्यात आलेली आहे. सन १९८७ व सन २०१७ च्या मान्य विकास आराखड्यामध्येसुद्धा मान्य टीपी नकाशानुसार आंबिल ओढा नाला दर्शविण्यात आलेला आहे. तसेच त्यावर २४ मीटरचा एचसीएमटीआर रस्ता दर्शविण्यात आलेला आहे.

शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मागील १०० वर्षांतील अधिकतम पर्जन्यमान गृहीत धरून प्रायमुव्ह एजन्सीकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. या एजन्सीच्या अहवाल व विकास आराखड्यानुसार आंबिल ओढा विकसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. विकास आराखड्यामधील नाला मार्गिका दुरुस्तीच्या कामामुळे १३० झोपडपट्टीधारक बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या नियोजन करण्यासाठी १६ मार्च रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानुसार नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

-----

७ जुलैपर्यंत स्थगिती

ओढ्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या नियोजनाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात कमी पडल्याचे विधी विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. येत्या ७ जुलैपर्यंत स्थगिती आहे. ७ जुलै रोजी पालिकेने केलेल्या उपाययोजना, रहिवाशांची केलेली व्यवस्था, बजावलेल्या नोटिसा, घरे हलविण्यास दिलेला वेळ याबाबत सविस्तर माहिती न्यायालयाला देणार असल्याचे सांगण्यात आले.