शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

तंत्रज्ञान व संशोधनाचा एकत्रित विचार व्हावा

By admin | Updated: November 16, 2016 03:20 IST

तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत असले, तरी भारतात अजूनही ३३ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल

पुणे : तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत असले, तरी भारतात अजूनही ३३ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात १०० टक्के वीजनिर्मितीची आवश्यकता आहे. यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानात बदल आणि संशोधन या बाबींचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. जी. गायकर यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स, पुणे केंद्राच्या वतीने भरवण्यात आलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सचे ३२ वे राष्ट्रीय अधिवेशन आणि ‘भारतीय विद्युत ऊर्जाक्षेत्रातील पुढील दशकातील शाश्वत प्रगतीची दिशा’ या चर्चासत्राचे उद्घाटन गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षपदी आयइआयचे ए. एस. सतीश होते. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे माजी तांत्रिक सभासद एस. व्ही. देव, पुणे केंद्राचे अध्यक्ष विजय घोगरे, डॉ. डी. जी. डोके, मानद सचिव व. ना. शिंदे आणि डॉ. व्ही. पी. नेरकर उपस्थित होते.गायकर म्हणाले, की ग्रामीण भागातील गरजा ओळखून आपले तंत्रज्ञान स्वयंपूर्ण झाले पाहिजे. तंत्रज्ञान आयात करण्यापेक्षा देशामध्ये त्याचे उत्पादन कमी खर्चात शक्य आहे. आता अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देऊन उद्योगांना पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षणाचा संबंध उद्योगाच्या गरजा व सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी थेट जोडला गेला पाहिजे.’’(प्रतिनिधी)