शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नव्या महापालिकेसाठी काँग्रेसचे उपोषण

By admin | Updated: July 1, 2017 07:53 IST

शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत न करता त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी करत त्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या मागणीचे निवेदन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले व त्याची प्रत आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आली.आमदार अनंत गाडगीळ, राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, सचिव संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, काका धर्मावत तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यात सहभागी झाले होते. याबाबत बोलताना बालगुडे यांनी सांगितले, की पुणे महापालिकेचे आताचे क्षेत्रफळ २५० चौरस किलोमीटर आहे. या गावांचा समावेश केला तर ते साधारण ५०० चौरस किलोमीटर होईल. हा आकार मुंबई महापालिकेपेक्षाही मोठा आहे. या सर्व भागाला नागरी सुविधा पुरवणे अवघड होईल. त्यामुळे त्यांची स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे.गाडगीळ यांनी सांगितले, की हा विषय आर्थिक अडचणी निर्माण करणारा आहे. काही हजार कोटी रुपये या नव्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागतील. सरकार ते देणार नाही व त्या भागातून कराद्वारे इतकी मोठी रक्कम उभी राहणे अवघड आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च करावा लागेल. त्याचा परिणाम पुण्यातील विकासकामांवर होईल. म्हणूनच या सर्व परिसरासाठी स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे. सरकारने याचा विचार करणे गरजेचे आहे.