शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

धनगर समाजाला अनुशेषासह दोन हजार कोटी न दिल्यास संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST

कळस : चालू अर्थसंकल्पात सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील अनुशेषासह २ हजार कोटींची तरतूद केली नाही तर धनगर समाज ...

कळस : चालू अर्थसंकल्पात सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील अनुशेषासह २ हजार कोटींची तरतूद केली नाही तर धनगर समाज व सरकार हा संघर्ष अटळ आहे, असा इशारा यशवंत प्रहार सेनेचे प्रमुख शशिकांत तरंगे यांनी दिला.

समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथील बाबीरदेवाला दुग्धाभिषेक घालून समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी करण्यात आली.

तरंगे म्हणाले की, चालू अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाच्या उन्नतीसाठी २ हजार कोटी रुपये व २२ योजनांची तरतूद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी करावी. धनगर समाजाला राजकीय पक्ष वापरून घेत आहेत, राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ केला आहे. कालच एका स्मारकासाठी ४०० कोटी दिले आहेत, आम्ही जिवंत माणसांना १ हजार कोटी रुपये मागतो आहोत, आमचा समाज हा वंचित आहे, समाज हा भरडला जात आहे, त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. आरक्षणासाठी यापूर्वी औरंगाबाद व पैठण येथील युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजातील युवकांनी ही आरक्षणासाठी आत्महत्या केली तेव्हा त्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी दिली तसेच आर्थिक मदत केली मात्र आमच्या बाबतीत वेगळा न्याय दिला जात आहे ही दुजाभावाची भावना बदलली पाहिजे.

मागील वर्षाची १ हजार कोटीची तरतूद व चालू वर्षीचे १ हजार कोटी असे अनुशेष भरून २ हजार कोटींची तरतूद करण्यात यावी चालू अर्थसंकल्पात सरकारने तरतूद केली नाही तर धनगर व सरकार संघर्ष हा अटळ आहे, असा इशारा देण्यात आला. यावेळी अप्पासाहेब माने, भाजपचे माजी इंदापूर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य माऊली चवरे, गजानन वाकसे, अजितसिंह पाटील, यशवंत कचरे, आबा थोरात, तानाजी मारकड उपस्थित होते.