शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रवाहांतील लोकांचा राजकारणावरील विश्वास व नव्याने प्रवेश ही भारतातील बदलांची नांदी -  नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 01:51 IST

पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्या काळात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहेत.  पुणे – मुंबईसारख्या शहरात अनेक विचारवंत आणि ...

पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्या काळात हा बदल प्रकर्षाने जाणवत आहेत.  पुणे – मुंबईसारख्या शहरात अनेक विचारवंत आणि सुशिक्षित वर्ग असलेल्या अनेक वॉर्डात ४४ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे चित्र होते. मात्र २०१५ नंतरच्या काळात मात्र हे प्रमाण वाढले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मध्यमवर्गीयांचा राजकारणाप्रती बदलत असलेला दृष्टीकोन दिसून येत आहे.  लोकांचा राजकारणावर असलेला विश्वास वाढत असल्याने ही एक सहाय्यभूत गोष्ट आहे,” असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, विधानपरिषदेतील प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. 

यशदा पुणे येथे लेखिका मंजिरी प्रभू आयोजित Pune international Literary Festival 2017  मध्ये त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक भाग म्हणून कार्यरत आहोत. पण गोमांसबंदी, कोणी शाकाहारी राहावे आणि कुणाच्या घरात अंडी खाल्ली जावीत का नाही हे काही मुद्दे मात्र निश्चित चिंताजनक आहेत. मात्र काही गंभीर बाबी दिसून आल्या आहेत. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्यांच्या बाबत आज त्यांनी संवेदनशील होत त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा कशी आणि कधी होईल हे आपणा सर्वांसमोर मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात इंदिरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली त्यातून देशातील लोकशाहीला मोठा धडा मिळाला, अनेक लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. 

कोणी म्हणत आहे की हिंदू महिलांनी अधिक मुले जन्माला घालावीत पण आपण एक पुरोगामी समाजात राहतो. महाराष्ट्रातील सुसंकृतपणा व शिष्टाचार सर्वश्रुत आहेत. मात्र आपल्यासारखा पुरोगामी विचार उत्तरेकडील काही राज्यांत अजूनही तितक्या प्रमाणात रुजले नसल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आपल्या कुटुंबात अधिक मुले असावीत की नाही याबद्दल प्रत्येक कुटुंबाचा स्वतंत्र मतप्रवाह असू शकतो. हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी यावेळी उलगडून सांगितली.  शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला हिंदू म्हणजे केवळ मंदिरात जाऊन घंटानाद करणारा नसून देशासाठी एकजुटीने एकत्र येणारा समाज म्हणजे हिंदू होय, असे त्या म्हणाल्या.

भारतात असलेल्या लोकशाहीबाबत मत मांडताना त्या म्हणाल्या, “आपण आपल्या हृदयातून लोकशाही स्वीकारली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. आज देशात महिलांचे हक्क, मुलांचे संरक्षण, महिलांवर होणारे अत्याचार याबाबत अनेक मागील २० – ३० वर्षांपासून असलेल्या स्थितीत कार्यक्रम होत आहेत. यामुळे या विषयांना जनतेला थेट व्यासपीठ उपलब्ध होत असून सरकारसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

सोशल मिडियाचा वाढता वापर हा देशातील अनेक प्रवाहांना पुढे घेऊन  जाण्यात यशस्वी होत आहे. जनतेला विविध विषयांत दिशा दाखवण्याचे काम सोशल मीडिया प्रभावीपणे करीत आहे. मात्र लोकांनी याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि कुणाची विनाकारण बदनामी होईल अशा क्लिप्स, फोटोग्राफ्स त्वरीत काढून टाकले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

विविध वाहिन्यांवर होत असलेल्या चर्चांना ग्रामीण भागातदेखील चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना देखील राजकीय, सामाजिक विषयांचे आकलन होत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तुर्हीन सिन्हा, कॉंग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आदीनी सहभाग घेतला. ॠषी सुरी यांनी सूत्रसंचालन केले.  याठिकाणी आयोजित पुस्तक प्रदर्शनालाही आ. डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली.