शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 15:09 IST

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना ...

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी वयाच्या ९८व्या वर्षी सहकाऱ्यांसमवेत भाकपमध्ये प्रवेश केला होता. वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात १८ ऑगस्टला विशेष कार्यक्रमात कॉ  चव्हाण यांनी पक्ष व कार्यकर्त्यांना विलीन केले होते. 

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेत चव्हाण यांनी चळवळीच्या नव्या पर्वाला सुरूवात केली होती.  सोव्हिएत क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही एकजूट श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे.