शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 15:09 IST

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना ...

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी वयाच्या ९८व्या वर्षी सहकाऱ्यांसमवेत भाकपमध्ये प्रवेश केला होता. वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात १८ ऑगस्टला विशेष कार्यक्रमात कॉ  चव्हाण यांनी पक्ष व कार्यकर्त्यांना विलीन केले होते. 

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेत चव्हाण यांनी चळवळीच्या नव्या पर्वाला सुरूवात केली होती.  सोव्हिएत क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही एकजूट श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे.