शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 15:09 IST

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना ...

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी वयाच्या ९८व्या वर्षी सहकाऱ्यांसमवेत भाकपमध्ये प्रवेश केला होता. वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात १८ ऑगस्टला विशेष कार्यक्रमात कॉ  चव्हाण यांनी पक्ष व कार्यकर्त्यांना विलीन केले होते. 

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेत चव्हाण यांनी चळवळीच्या नव्या पर्वाला सुरूवात केली होती.  सोव्हिएत क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही एकजूट श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे.