शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोवा-मुंबई मार्गाचे काम पूर्ण करावे

By admin | Updated: August 4, 2016 06:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली.

पिंपरी : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७चे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे कामाचे नियोजन केले होते. पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी देखील संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. खासदार बारणे म्हणाले, ‘‘संपूर्ण देशामध्ये रस्ते विकास मंत्रालयाकडून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरील काम मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरूआहे. याचा फटका सदरच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थी व गोवा, अलिबाग, रायगड, सिंधुदुर्ग या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या संबंधी नागरिकांनी तक्रारी केल्या. पाच वर्षांपासून या कामामध्ये प्रगती नसल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना या असुविधांचा त्रास सहन करावा लागत आहे.’’ (प्रतिनिधी)