शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

हात गमावलेल्या व्यापाऱ्याला भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 05:45 IST

एका चौकात सिग्नलवर थांबले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

पुणे : अपघातात उजवा हात गमावलेल्या व्यापाºयाला रविवारी झालेल्या महालोकअदालतीमध्ये दिलासा मिळाला. मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा तडजोडीअंती २४ लाख ५० हजार रुपये देत निकाली काढण्यात आला. सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला.खेड मार्केट यार्डामध्ये व्यापार संदीप बजीरंग गावडे (वय ३८, राजगुरुनगर) हे २२ फेब्रुवारी रोजी चाकण परिसरातून दुचाकीवरून चालले होते. एका चौकात सिग्नलवर थांबले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले व ट्रक त्यांच्या उजव्या हातावरून गेला. या अपघातात त्यांचा उजवा हात खांद्यापासून निकामी झाला. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावडे यांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.गावडे यांचे वय ३८ आहे. त्यांना आलेल्या अपंगत्वाचा विचार करून जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. ट्रकची विमा कंपनी असलेल्या ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.तडजोडीसाठी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी आणि ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टॅग्स :Accidentअपघात