शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

आयटीतील कामगारकपातीवर समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 02:37 IST

आयटी, टेलिकॉम, बीपीओ अशा कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्याच्या पवित्र्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांवर नोकरी जाण्याची सततची टांगती तलवार आहे.

पुणे : आयटी, टेलिकॉम, बीपीओ अशा कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्याच्या पवित्र्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांवर नोकरी जाण्याची सततची टांगती तलवार आहे. या कर्मचा-यांच्या कपाती प्रश्नामध्ये शासनाने हस्तक्षेप करून नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (एफआयटीई) संघटनेने राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे केली असून, त्याला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या स्वरूपाची समिती स्थापन करण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे.काही वर्षांपासून आयटी क्षेत्रातील वातावरण अत्यंत अस्थिर बनले आहे. कंपनींकडून कर्मचाºयांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला भाग पाडणे, कामावरून तडकाफडकी पूर्वकल्पना न देता काढणे, नवीन लोकांची भरती केली आहे; पण त्यांना काढलेले नाही, अशा कर्मचाºयांना ‘तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही,’ असे सांगण्यात येत असल्यामुळे काढून टाकण्याची भीती कर्मचाºयांना आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काही कर्मचाºयांनी मिळून फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (एफआयटीई) या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या काही प्रतिनिधींनी राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याविषयी ‘लोकमत’शी बोलताताना एफआयटीईचे प्रदेशाध्यक्ष पवनजित माने म्हणाले, की आयटी कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या कपातीसंदर्भात पुणे कामगार न्यायालयात ३० ते ३५ केस, तर कामगार आयुक्तालयात ४० केस दाखल आहेत.शुक्रवारी नागपूर येथे विधासभेत जाऊन आम्ही कामगारमंत्र्यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या संदर्भात मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यात बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक कंपनीच्या कर्मचाºयांचे आयडी कामगार आयुक्तालयाला जोडलेले असतात, तिथे तुमच्या तक्रारीही टाकत जा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकारचा हस्तक्षेप हवादिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. या प्रकरणामध्ये राज्य शासनाने हस्तक्षेप केल्यास कर्मचाºयांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावणे, काढून टाकणे या गोष्टींना नक्कीच आळा बसेल. त्यामुळे आम्ही राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याशी चर्चेसाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. आमच्या मागण्याही त्यांना पाठविल्या होत्या. राज्यस्तरीय समिती गठीत करून कंपनीमध्ये सल्लागार मंडळ नेमले ,तर बरेच प्रश्न सुटू शकतील.

टॅग्स :Employeeकर्मचारीnewsबातम्या