शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

पंतप्रधानांचे मौनच बोलके, वाढत्या असहिष्णुतेबाबत भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:41 IST

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे. गौरी लंकेश यांची हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध अशा मुद्द्यांना पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.देशातील असहिष्णुता, विचारवंतांची हत्या, चित्रपटांना होणारा विरोध, भाजपा नेत्यांकडून कलाकारांना मिळणाºया धमक्या या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.चव्हाण म्हणाले, ‘एकीकडे महिला वैमानिक हवाई दलात सहभागी होत असल्याबद्दल मोदी कौतुकाचा वर्षाव करतात. मात्र, गौरी लंकेश यांची हत्या असो की चित्रपटांना होणारा विरोध, याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही टिप्पणी केली जात नाही. कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामुळे ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत. कायद्याच्या राज्यात हे चालणार नाही, असे त्यांनी खडसावून सांगायला हवे. देशातील असहिष्णुता वाढत असताना पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेतल्यास हे प्रकार थांबू शकतील. मात्र, त्यांना हे प्रकार थांबवायचे आहेत का, हामूळ प्रश्न आहे. कोणतीही टिप्पणीन करणे म्हणजे मूकसंमतीदेण्यासारखे आहे. त्यांचे मौनच बोलके आहे.’>रोजगार कुठे गेले?मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षांत ७० लाख रोजगार निर्माण झाले का, असा प्रश्न चव्हाण यांनी केला.‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’ या विषयावर गुरुवारी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.चव्हाण म्हणाले, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असतो. उद्योग क्षेत्राचा थेट संबंध रोजगारनिर्मितीशी असतो. नोटाबंदीच्या निर्णयाचा रोजगारावर विपरीत परिणाम झाला. सीएमआयई या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले.’ नारायण राणे यांच्या पक्षाला भाजपाने उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येतील, असे सूतोवाचही चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी