शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे मौनच बोलके, वाढत्या असहिष्णुतेबाबत भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:41 IST

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे

पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे. गौरी लंकेश यांची हत्या असो की गोमांस, गोरक्षण, चित्रपटांना विरोध अशा मुद्द्यांना पंतप्रधानांची मूकसंमती तर नाही ना, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.देशातील असहिष्णुता, विचारवंतांची हत्या, चित्रपटांना होणारा विरोध, भाजपा नेत्यांकडून कलाकारांना मिळणाºया धमक्या या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.चव्हाण म्हणाले, ‘एकीकडे महिला वैमानिक हवाई दलात सहभागी होत असल्याबद्दल मोदी कौतुकाचा वर्षाव करतात. मात्र, गौरी लंकेश यांची हत्या असो की चित्रपटांना होणारा विरोध, याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही टिप्पणी केली जात नाही. कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामुळे ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत. कायद्याच्या राज्यात हे चालणार नाही, असे त्यांनी खडसावून सांगायला हवे. देशातील असहिष्णुता वाढत असताना पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका घेतल्यास हे प्रकार थांबू शकतील. मात्र, त्यांना हे प्रकार थांबवायचे आहेत का, हामूळ प्रश्न आहे. कोणतीही टिप्पणीन करणे म्हणजे मूकसंमतीदेण्यासारखे आहे. त्यांचे मौनच बोलके आहे.’>रोजगार कुठे गेले?मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी १० टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यात गेल्या ३ वर्षांत ७० लाख रोजगार निर्माण झाले का, असा प्रश्न चव्हाण यांनी केला.‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’ या विषयावर गुरुवारी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.चव्हाण म्हणाले, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असतो. उद्योग क्षेत्राचा थेट संबंध रोजगारनिर्मितीशी असतो. नोटाबंदीच्या निर्णयाचा रोजगारावर विपरीत परिणाम झाला. सीएमआयई या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले.’ नारायण राणे यांच्या पक्षाला भाजपाने उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येतील, असे सूतोवाचही चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी