शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:37 IST

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

राजुरी  - जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.जुन्नर तालुक्यात बागायती शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांबरोबरच खरीप हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, कांदा, लसूण यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी पंधरा वर्षांनंतर प्रथमच विक्रमी थंडी पडली आहे. याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये पिंपळवंडी परिसरात नगदी पीक असणारे द्राक्ष पिकाची १५० एकरवर शेतकºयांनी लागवड केली आहे.थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या आकारात फरक पडला असून, त्यांच्या फुगवण्या थांबले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये शर्करेचे प्रमाण पण अत्यंत अल्प आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळत आहे.तसेच व्यापाºयांनी स्वत:चा ग्रुप करून शेतकºयांकडून द्राक्षे खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे, द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. यामुळे सध्या द्राक्षाचा भाव फक्त ५० रुपये किलो झाल्यामुळे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. अशीच अवस्था ३00 एकरांवर लावलेल्या केळी या पिकाची झाली असून, केळीचे फन पिवळे पडले असून, त्याच्यावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड केली असून, थंडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.तालुक्यामध्ये सुमारे २ हजार एकरांवर शेतक-यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. थंडीमुळे डाळिंबाच्या फळबागेतील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी, सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी थंडी गहू, हरभरा, लसूण, कांदा या खरीप पिकांना मात्र वरदान ठरणार आहे.थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षमण्याच्या आकारमानात घट झाली आहे. झाडांचा विकास होत नाही तसेच मनी क्रॅक होण्याचे प्रमाण वाढणार आहे यामुळे द्राक्षाला वजन नाही. या सर्वांचा परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होणार आहे.- ज्ञानेश्वर शेळके प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, राजुरीखरीप पिकांना वरदान ठरणारी थंडी मात्र इतर पिकांना नुकसानकारक असून, याचा काही पिकांवर दूरगामी परिणाम होणार असून, शेतकºयांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.- संजय भुजबळ, अध्यक्ष, जुन्नर तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :agricultureशेतीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन