शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:37 IST

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

राजुरी  - जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.जुन्नर तालुक्यात बागायती शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांबरोबरच खरीप हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, कांदा, लसूण यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी पंधरा वर्षांनंतर प्रथमच विक्रमी थंडी पडली आहे. याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये पिंपळवंडी परिसरात नगदी पीक असणारे द्राक्ष पिकाची १५० एकरवर शेतकºयांनी लागवड केली आहे.थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या आकारात फरक पडला असून, त्यांच्या फुगवण्या थांबले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये शर्करेचे प्रमाण पण अत्यंत अल्प आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळत आहे.तसेच व्यापाºयांनी स्वत:चा ग्रुप करून शेतकºयांकडून द्राक्षे खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे, द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. यामुळे सध्या द्राक्षाचा भाव फक्त ५० रुपये किलो झाल्यामुळे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. अशीच अवस्था ३00 एकरांवर लावलेल्या केळी या पिकाची झाली असून, केळीचे फन पिवळे पडले असून, त्याच्यावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड केली असून, थंडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.तालुक्यामध्ये सुमारे २ हजार एकरांवर शेतक-यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. थंडीमुळे डाळिंबाच्या फळबागेतील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी, सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी थंडी गहू, हरभरा, लसूण, कांदा या खरीप पिकांना मात्र वरदान ठरणार आहे.थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षमण्याच्या आकारमानात घट झाली आहे. झाडांचा विकास होत नाही तसेच मनी क्रॅक होण्याचे प्रमाण वाढणार आहे यामुळे द्राक्षाला वजन नाही. या सर्वांचा परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होणार आहे.- ज्ञानेश्वर शेळके प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, राजुरीखरीप पिकांना वरदान ठरणारी थंडी मात्र इतर पिकांना नुकसानकारक असून, याचा काही पिकांवर दूरगामी परिणाम होणार असून, शेतकºयांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.- संजय भुजबळ, अध्यक्ष, जुन्नर तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :agricultureशेतीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन