शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांच्या पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:37 IST

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

राजुरी  - जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.जुन्नर तालुक्यात बागायती शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष या पिकांबरोबरच खरीप हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, कांदा, लसूण यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी पंधरा वर्षांनंतर प्रथमच विक्रमी थंडी पडली आहे. याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये पिंपळवंडी परिसरात नगदी पीक असणारे द्राक्ष पिकाची १५० एकरवर शेतकºयांनी लागवड केली आहे.थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या आकारात फरक पडला असून, त्यांच्या फुगवण्या थांबले आहेत. तसेच त्यांच्यामध्ये शर्करेचे प्रमाण पण अत्यंत अल्प आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळत आहे.तसेच व्यापाºयांनी स्वत:चा ग्रुप करून शेतकºयांकडून द्राक्षे खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे, द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. यामुळे सध्या द्राक्षाचा भाव फक्त ५० रुपये किलो झाल्यामुळे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. अशीच अवस्था ३00 एकरांवर लावलेल्या केळी या पिकाची झाली असून, केळीचे फन पिवळे पडले असून, त्याच्यावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड केली असून, थंडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.तालुक्यामध्ये सुमारे २ हजार एकरांवर शेतक-यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. थंडीमुळे डाळिंबाच्या फळबागेतील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी, सर्वसामान्यांना हुडहुडी भरवणारी थंडी गहू, हरभरा, लसूण, कांदा या खरीप पिकांना मात्र वरदान ठरणार आहे.थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षमण्याच्या आकारमानात घट झाली आहे. झाडांचा विकास होत नाही तसेच मनी क्रॅक होण्याचे प्रमाण वाढणार आहे यामुळे द्राक्षाला वजन नाही. या सर्वांचा परिणाम द्राक्षाच्या बाजारभावावर होणार आहे.- ज्ञानेश्वर शेळके प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, राजुरीखरीप पिकांना वरदान ठरणारी थंडी मात्र इतर पिकांना नुकसानकारक असून, याचा काही पिकांवर दूरगामी परिणाम होणार असून, शेतकºयांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.- संजय भुजबळ, अध्यक्ष, जुन्नर तालुका शेतकरी संघटना

टॅग्स :agricultureशेतीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन