शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोकाटेंवरील हल्ल्यास ‘जशास तसे उत्तर देणार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:45 IST

संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा; हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी

पुणे : इतिहास संशोधक, व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. यापुढील काळात त्यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याचे उत्तर विरोधकांना ‘जशास तसे’ दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी इशारा दिला. सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी सरकारकडे या वेळी करण्यात आली.राज्यातील पुरोगामी संस्था, संघटना यांच्यावर टांगती तलवार असून, सरकार याबाबत दुर्लक्ष करीत आहे. कर्नाटकातील पोलीस महाराष्ट्रात येतात. ते करीत असलेल्या तपासात एका चिठ्ठीत ३६ जणांची नावे सापडतात. ज्यांच्या जिवाला यापुढील काळात धोका आहे. त्यात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, भारत पाटणकर, माजी न्यायमूर्ती डॉ. बी. जे. कोळसे पाटील आदींची नावे त्या यादीत समाविष्ट असल्याने पुरोगामी महाराष्ट्रातील विचारवंतांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मराठा समाजाला अद्याप आरक्षण नसल्याने त्यानिमित्ताने काढण्यात येत असलेल्या मोर्चांमुळे राज्यातील वातावरण संवेदनशील आहे. तशातच आता कोकाटेंना देण्यात आलेल्या धमकीने नेमके काय चालले आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढणार असून, यात कुणी बाधा आणल्यास त्याला उत्तर देण्यात येणार आहे.दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वी जे कार्यकर्ते पकडले ते शिवप्रतिष्ठान व सनातनशी संबंधित होते. या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी राहुल पोकळे, अमोल काटे, अजय भोसले उपस्थित होते.विचारवंतांना संपविण्याचा डाववाढत्या दहशतवादी कारवाया, तपासात मुंबई व औरंगाबाद येथून ताब्यात घेतलेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यामुळे विचारवंतांना संपविण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. संस्कृती व विचारांनीच विविध प्रश्नांवर उत्तरे शोधता येतील. त्याच्या विरोधात जाऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आता कोकाटे यांना संरक्षण देणार असून, यापुढील काळात विकृतीच्या पद्धतीने आमच्याशी संवाद साधणार असेल तर त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारात मात्र सरकारकडून कुठल्याही सहकार्याची अपेक्षा नाही. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड