शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

ढगाळ हवामानाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:16 IST

बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला.

बारामती : बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला. त्याचाही फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ढगाळ हवामान, तुरळक पावसामुळे दुपारी १२ पर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. नागरिक चांगलेच गारठले आहेत.जानेवारीमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांत त्यानंतर पुन्हा आज थंडी वाढली, तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषितज्ज्ञांनी तापमान आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. वाढत्या थंडीचा, पावसाचा द्राक्षबागा,भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.बारामती, इंदापूर तालुक्यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास ७५ टक्के द्राक्षबागांची काढणी पूर्र्ण झाली आहे. उर्वरित २५ टक्के बागांची काढणी सध्या सुरू आहे. द्राक्षांना दरदेखील सध्या चांगले आहेत. या २५ टक्के बागांमध्ये सध्या पडणाºया कडाक्याच्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षांनातडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीदेखील भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कडधान्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळींब बागांवर वाढत्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसामुळे तेल्या रोगाचे सावट आहे. वातावरणातील या बदलाची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर या पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे.>लासुर्णे : इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे तीन हजार सहाशे एकर द्राक्षाच्या क्षेत्रामधून २५ हजार मेट्रीक टन द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. या मध्ये बोरी (ता. इंदापूर) येथे द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकºयांचा निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्याकडे कल असतो.१ आॅगस्टपासून द्राक्षांच्या छाटणीस सुरवात करण्यात येते. १ ते २० आॅगस्टपर्यंत छाटणी केलेल्या द्राक्षांच्या हंगामास सुरवात झाली असून परदेशातील चायना, मलेशिया देशामध्ये बोरी गावातील द्राक्षांची निर्यात होत आहे.ढगाळ हवामानामुळे द्राक्षेच्या बागेवर विविध रोगांचाप्रादुर्भाव होऊन द्राक्षांचे मणी क्रँक जाणार असून यामुळे व्यापारी या भागातील द्राक्ष कमी दराने मागत असल्याने शेतकरी दोन्ही बाजूने अडचणीत सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.>गहू, कांदापिक धोक्यातदौंड : हवामानाची अशीच परिस्थिती आठ ते दहा दिवस राहिली, तर हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष, डाळिंब यांसह अन्य पिकांवर रोगराईचे सावट निर्माण होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी दौंड तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्यामुळे पहाटेच्या सुमारास धुके निर्माण होऊन हवामानात बदल झाला. जर हवामान असेच राहिले तर हरभºयावर घाटी आळी रोग, गव्हावर तांबेºयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.द्राक्षांवर बोरी रोग, तर डाळिंबावर मावा रोग पडू शकतो. याचबरोबरीने आंब्याचा मोहोर गळण्याची, कांद्यावर करपा पडण्याची दाट शक्यताआहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना नैसर्गिक संकट शेतकºयांवर येऊ शकते. तेव्हा शेतकºयांनी नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.>गेल्या दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक आहे. इतर दिवशी ३० ते ३२ अंश सेल्सिअस असणारे तापमान बुधवारी (दि. ७) २४ ते २५ अंशांपर्यंत हे घसरले आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या थंड हवामानामुळे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता आहे. ज्वारीचे काढलेले पीक झाकून ठेवावे. ढगाळ हवामानाच्या पार्श्वभूमीवर पावसाची शक्यता लक्षातघेऊन औषध फवारणीचे शेतकºयांनी नियोजन करावे. पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी पाऊस येण्यापूर्वी औषध फवारणी करावी. तसेच,पाऊस येण्यापूर्वी फवारणीशक्य न झाल्यास पाऊस येऊन गेल्यानंतर औषधफवारणी करावी. त्यामुळे पिकांवर होणारा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.- डॉ. सय्यद अली,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख>वेळीच दखल घेणे गरजेचेबदलत्या हवामानामुळे शेतकºयांनी वेळीच शेतीची दखल घेणे गरजेचे आहे. तरीदेखील काळजी करण्याचे कारण नाही. हे ढगाळ वातावरण १ ते २ दिवस राहिले तर त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकत नाही. मात्र असेच वातावरण आठवडाभर राहिले तर याचे नुकसान काही पिकांना सोसावे लागेल. तेव्हा शेतकºयांनी काही अडचणी असल्यास दौंड तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा.- अनिल बोरावके, (दौंड तालुका कृषी अधिकारी)