शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:16 IST

बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला.

बारामती : बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला. त्याचाही फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ढगाळ हवामान, तुरळक पावसामुळे दुपारी १२ पर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. नागरिक चांगलेच गारठले आहेत.जानेवारीमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांत त्यानंतर पुन्हा आज थंडी वाढली, तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषितज्ज्ञांनी तापमान आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. वाढत्या थंडीचा, पावसाचा द्राक्षबागा,भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.बारामती, इंदापूर तालुक्यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास ७५ टक्के द्राक्षबागांची काढणी पूर्र्ण झाली आहे. उर्वरित २५ टक्के बागांची काढणी सध्या सुरू आहे. द्राक्षांना दरदेखील सध्या चांगले आहेत. या २५ टक्के बागांमध्ये सध्या पडणाºया कडाक्याच्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षांनातडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीदेखील भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कडधान्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळींब बागांवर वाढत्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसामुळे तेल्या रोगाचे सावट आहे. वातावरणातील या बदलाची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर या पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे.>लासुर्णे : इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे तीन हजार सहाशे एकर द्राक्षाच्या क्षेत्रामधून २५ हजार मेट्रीक टन द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. या मध्ये बोरी (ता. इंदापूर) येथे द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकºयांचा निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्याकडे कल असतो.१ आॅगस्टपासून द्राक्षांच्या छाटणीस सुरवात करण्यात येते. १ ते २० आॅगस्टपर्यंत छाटणी केलेल्या द्राक्षांच्या हंगामास सुरवात झाली असून परदेशातील चायना, मलेशिया देशामध्ये बोरी गावातील द्राक्षांची निर्यात होत आहे.ढगाळ हवामानामुळे द्राक्षेच्या बागेवर विविध रोगांचाप्रादुर्भाव होऊन द्राक्षांचे मणी क्रँक जाणार असून यामुळे व्यापारी या भागातील द्राक्ष कमी दराने मागत असल्याने शेतकरी दोन्ही बाजूने अडचणीत सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.>गहू, कांदापिक धोक्यातदौंड : हवामानाची अशीच परिस्थिती आठ ते दहा दिवस राहिली, तर हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष, डाळिंब यांसह अन्य पिकांवर रोगराईचे सावट निर्माण होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी दौंड तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्यामुळे पहाटेच्या सुमारास धुके निर्माण होऊन हवामानात बदल झाला. जर हवामान असेच राहिले तर हरभºयावर घाटी आळी रोग, गव्हावर तांबेºयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.द्राक्षांवर बोरी रोग, तर डाळिंबावर मावा रोग पडू शकतो. याचबरोबरीने आंब्याचा मोहोर गळण्याची, कांद्यावर करपा पडण्याची दाट शक्यताआहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना नैसर्गिक संकट शेतकºयांवर येऊ शकते. तेव्हा शेतकºयांनी नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.>गेल्या दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक आहे. इतर दिवशी ३० ते ३२ अंश सेल्सिअस असणारे तापमान बुधवारी (दि. ७) २४ ते २५ अंशांपर्यंत हे घसरले आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या थंड हवामानामुळे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता आहे. ज्वारीचे काढलेले पीक झाकून ठेवावे. ढगाळ हवामानाच्या पार्श्वभूमीवर पावसाची शक्यता लक्षातघेऊन औषध फवारणीचे शेतकºयांनी नियोजन करावे. पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी पाऊस येण्यापूर्वी औषध फवारणी करावी. तसेच,पाऊस येण्यापूर्वी फवारणीशक्य न झाल्यास पाऊस येऊन गेल्यानंतर औषधफवारणी करावी. त्यामुळे पिकांवर होणारा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.- डॉ. सय्यद अली,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख>वेळीच दखल घेणे गरजेचेबदलत्या हवामानामुळे शेतकºयांनी वेळीच शेतीची दखल घेणे गरजेचे आहे. तरीदेखील काळजी करण्याचे कारण नाही. हे ढगाळ वातावरण १ ते २ दिवस राहिले तर त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकत नाही. मात्र असेच वातावरण आठवडाभर राहिले तर याचे नुकसान काही पिकांना सोसावे लागेल. तेव्हा शेतकºयांनी काही अडचणी असल्यास दौंड तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा.- अनिल बोरावके, (दौंड तालुका कृषी अधिकारी)