शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दौंडचे ‘वसुली’नाके अखेर बंद

By admin | Updated: October 5, 2015 01:56 IST

मुदत संपल्याने दौंडच्या नगरमोरीजवळील तसेच भीमा-नदीच्या परिसरातील टोलनाके अखेर बंद करण्यात आले. रस्त्याची बिकट अवस्था, सुविधांचा अभाव असतानाही येथे वसुली सुरू होती

दौंड : मुदत संपल्याने दौंडच्या नगरमोरीजवळील तसेच भीमा-नदीच्या परिसरातील टोलनाके अखेर बंद करण्यात आले. रस्त्याची बिकट अवस्था, सुविधांचा अभाव असतानाही येथे वसुली सुरू होती. ती बंद झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. भीमा नदीजवळील टोलनाका हा गुन्हेगारीचा अड्डाच बनला होता.रेल्वे उड्डाणपूल ते नगरमोरी चौक या ठिकाणी टोलनाका होता. उड्डाणपूल आणि त्या परिसरातील रस्त्याच्यासंदर्भात टोल वसूल केला जात होता. मात्र, उड्डाणपुलावर वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा नाहीत. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. तसेच पुलाची दोन्ही बाजूंनी रचना चढत्या आणि उतरत्या पद्धतीने आहे. त्यामुळे मुळात हा पूल चुकीच्या पद्धतीने उभारलेला असल्याने वेळोवेळी अपघातदेखील झालेले आहेत. पुलापासून ते नगरमोरी चौकापर्यंत रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहे. असे असतानाही येथे टोल वसूल केला जात होता.दौंड-अहमदनगर रस्त्यावरील भीमा-नदीच्या परिसरात असलेल्या टोलनाक्यावर बऱ्याचदा हाणामाऱ्या झाल्या आहे. परराज्यातील वाहनचालकाच्या गाडीचा नंबर पाहून त्यांची लुटमार केली जात असे. हा टोलनाका गुन्हेगारीचा अड्डा झाला होता. रस्त्याची तर बिकट अवस्था आहे. रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात हेच समजत नाही. तसेच टोलनाक्यापासून काही अंतरावर भीमा नदीचा पूल आहे. या पुलावरून जड वाहन गेले तर पूल खाली वर होतो. पुलाला हादरे बसतात. या पुलावरून एखाद्या वाहनाला कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती नाही. तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसूल केला जात होता. विशेषत: सिद्धटेक येथील भाविकांना याचा मोठा त्रास होत असे. गणेशभक्त सिद्धिविनायकला जाण्यासाठी दौंडमधून जावे लागते. मात्र दर्शनाला जाता जाता भीमा नदीपात्राच्या टोलनाक्यावरील दादागिरी सहन करावी लागत होती. टोलनाके बंद झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)दोन्ही टोलनाके उद्ध्वस्त करासध्याच्या परिस्थितीत दोन्ही टोलनाके बंद झालेले आहेत. ते टोलनाके उद्ध्वस्त करावेत. ते तसेच ठेवले तर गुन्हेगारीचे तसेच दारूचे अड्डे होतील. त्यातच रात्री-बेरात्री या रिकाम्या टोलनाक्यातून बाहेरच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील वाहनचालकाकडून टोलवसुली केली जाऊ शकते. त्याकामी बोगस पावत्या छापल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा दोन्ही टोलनाके उद्ध्वस्त करावे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी यांनी दलिा आहे.माहितीसाठी फलक लावणार सिद्धिविनायकाच्या भक्तांंच्या वाहनासह इतर राज्यातून तसेच परराज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांच्या माहितीसाठी ‘‘दोन्ही टोलनाके बंद झाले आहेत. तेव्हा कोणी टोल भरू नये’’ अशा आशयाचे फलक दोन्ही टोलनाक्यांच्या परिसरात मराठा महासंघाच्या वतीने लावण्यात येणार आहेत.