शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

उरुळी कांचनमध्ये बंद

By admin | Updated: March 2, 2015 23:26 IST

बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये आज (दि. २) कडकडीत बंद पाळण्यात आला.

उरुळी कांचन : बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये आज (दि. २) कडकडीत बंद पाळण्यात आला.महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांनी निषेध केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन (पाटील), पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली उरुळी कांचन गावातून सकाळी ११ वाजता भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. यात बोरीभडकचे असंख्य नागरिक हातात चैतन्यचा फोटो घेऊन सहभागी झाले होते.मोर्चा उपोषणस्थळी पोहोचल्यावर त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. या वेळी बोरीभडकचे माजी सरपंच अशोक काळे यांनी तीव्र निषेध केला. भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन यांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत मागणी केली. महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या विश्वस्तांना शाळा व महाविद्यालयातील गैरप्रकार थांबवता येत नसतील तर पदावरून पायउतार व्हा, असे आवाहन केले. भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी भेट दिली. उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. मोर्चात ग्रामपंचायत सदस्य युवराज कांचन, सुनील दीक्षित, अमित कांचन, संतोष गायकवाड, भाजपाचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जगताप, एम. जी. शेलार, राजेंद्र तावरे, नवनाथ गव्हाणे, अशोकराव काळे, नामदेव बोराटे, सचिन मचाले, आबासाहेब आतकिरे, दीपक आतकिरे, मोहन म्हेत्रे, मंगेश भोसेकर, बोरीभडकच्या सरपंच अनिता गव्हाणे, वैशाली शिंदे, शांताबाई शेळके, कल्पना गवळी, यांच्यासह उरुळी कांचन व बोरीभडकचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.