शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आधी वेफर्सचे प्लॅस्टिक बंद करा; मग दुधाचे- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:44 IST

सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

पुणे : सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच प्लॅस्टिककोंडी न फुटल्यास दुधाचे भाव १२ ते १५ रुपये लिटरमागे वाढतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिकचा पुनर्वापर न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक दूध उत्पादकांना आणि वितरकांना बाजारात विकल्या गेलेल्या दुधाच्या पिशव्या संकलित कराव्या लागणार आहेत. मात्र ते शक्य नसल्याने प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने १५ डिसेंबरनंतर प्लॅस्टिकचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्लॅस्टिकबंदी जाणवू शकते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी म्हणाले, की दूध पिशव्यांचे संकलन करणे वितरकांना जिकिरीचे होणार आहे. तसेच संकलित झालेल्या पिशव्यांमध्ये काही प्रमाणात दूध शिल्लक असल्याने त्याचा वास येण्याचा अथवा अळ््या होण्याचा संभव असतो. याशिवाय ४५ ते ५० रुपये लिटरमागे खर्च करणारा ग्राहक प्लॅस्टिक पिशवीचा एक रुपया परत मिळविण्यासाठी पिशवी परत देईलच असे नाही. त्यामुळे असे संकलन कटकटीचे होईल. सरकारने दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत अशीच दंडेली सुरू केल्यास आम्ही बाटलीबंद दूध सुरू करू. त्यानंतर मात्र दुधाच्या किमतीत लिटरमागे १२ ते १५ रुपयांची वाढ होईल.दुधाच्या भेसळीचा आधीच प्रश्न आहे. बाटलीबंद दूध केल्यास भेसळीची शक्यता अधिक वाढते. त्याची जबाबदारी नक्की कोणावर, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच बाटलीची स्वच्छता करण्यासाठीदेखील लाखो लिटर पाण्याची आवश्यकता भासेल, याचेही भान ठेवले पाहिजे. सरकारने वेफर्ससह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांवर असेच निर्बंध घालावेत. त्यानंतर दूध पिशवीचा विचार व्हावा.- राजू शेट्टी

टॅग्स :milkदूधRaju Shettyराजू शेट्टी