शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

आधी वेफर्सचे प्लॅस्टिक बंद करा; मग दुधाचे- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:44 IST

सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

पुणे : सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच प्लॅस्टिककोंडी न फुटल्यास दुधाचे भाव १२ ते १५ रुपये लिटरमागे वाढतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिकचा पुनर्वापर न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक दूध उत्पादकांना आणि वितरकांना बाजारात विकल्या गेलेल्या दुधाच्या पिशव्या संकलित कराव्या लागणार आहेत. मात्र ते शक्य नसल्याने प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने १५ डिसेंबरनंतर प्लॅस्टिकचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्लॅस्टिकबंदी जाणवू शकते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी म्हणाले, की दूध पिशव्यांचे संकलन करणे वितरकांना जिकिरीचे होणार आहे. तसेच संकलित झालेल्या पिशव्यांमध्ये काही प्रमाणात दूध शिल्लक असल्याने त्याचा वास येण्याचा अथवा अळ््या होण्याचा संभव असतो. याशिवाय ४५ ते ५० रुपये लिटरमागे खर्च करणारा ग्राहक प्लॅस्टिक पिशवीचा एक रुपया परत मिळविण्यासाठी पिशवी परत देईलच असे नाही. त्यामुळे असे संकलन कटकटीचे होईल. सरकारने दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत अशीच दंडेली सुरू केल्यास आम्ही बाटलीबंद दूध सुरू करू. त्यानंतर मात्र दुधाच्या किमतीत लिटरमागे १२ ते १५ रुपयांची वाढ होईल.दुधाच्या भेसळीचा आधीच प्रश्न आहे. बाटलीबंद दूध केल्यास भेसळीची शक्यता अधिक वाढते. त्याची जबाबदारी नक्की कोणावर, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच बाटलीची स्वच्छता करण्यासाठीदेखील लाखो लिटर पाण्याची आवश्यकता भासेल, याचेही भान ठेवले पाहिजे. सरकारने वेफर्ससह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांवर असेच निर्बंध घालावेत. त्यानंतर दूध पिशवीचा विचार व्हावा.- राजू शेट्टी

टॅग्स :milkदूधRaju Shettyराजू शेट्टी