शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

राज्यात ‘स्वच्छता अभियान’ गतिमान करणार : बबनराव लोणीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:49 IST

शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभनिर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी 

पुणे : प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात ‘स्वच्छता अभियान’ अधिक गतिमान करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी केले.  ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने विधानभवन परिसरात आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लोणीकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) कांत गुडेकर यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही जनसेवा असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे,असे नमूद करून बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारक-यांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविल्या जातात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे. विश्वास देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारक-यांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही. त्यामुळे दूचाकी वरून आरोग्य सेवा पुरवली जात आहे.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील १७ जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी शासनाच्या वतीने ‘नमामि’ चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.........निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी वारकऱ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद,जालना, लातूर, ठाणे,अहमदनगर ,बीड, नांदेड,परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ व औरंगाबाद या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जाचे कलापथक या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विविध स्वच्छता संदेशांनी रंगविलेले चित्ररथ वारीमध्ये सहभागी होणार आहेत.निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.पालखी सोहळ्यानिमित्त अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर