शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

राज्यात ‘स्वच्छता अभियान’ गतिमान करणार : बबनराव लोणीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:49 IST

शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभनिर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी 

पुणे : प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात ‘स्वच्छता अभियान’ अधिक गतिमान करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी केले.  ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने विधानभवन परिसरात आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लोणीकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) कांत गुडेकर यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही जनसेवा असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे,असे नमूद करून बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारक-यांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविल्या जातात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे. विश्वास देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारक-यांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही. त्यामुळे दूचाकी वरून आरोग्य सेवा पुरवली जात आहे.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील १७ जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी शासनाच्या वतीने ‘नमामि’ चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.........निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी वारकऱ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद,जालना, लातूर, ठाणे,अहमदनगर ,बीड, नांदेड,परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ व औरंगाबाद या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जाचे कलापथक या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विविध स्वच्छता संदेशांनी रंगविलेले चित्ररथ वारीमध्ये सहभागी होणार आहेत.निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.पालखी सोहळ्यानिमित्त अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर