शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

विम्यासाठी एकत्रित विचार न करता वर्गीकरण करावे, रिक्षा व्यावसायिकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: प्रवासी वाहनांच्या विम्याचा एकत्रित विचार न करता त्यांचे वर्गीकरण करावे व त्यानुसारच त्यांचा वार्षिक हप्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: प्रवासी वाहनांच्या विम्याचा एकत्रित विचार न करता त्यांचे वर्गीकरण करावे व त्यानुसारच त्यांचा वार्षिक हप्ता ठरवावा, असा आदेश भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये दिला आहे. विमा कंपन्या या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याने रिक्षा व्यावसायिकांवर अन्याय होत आहे.

रिक्षा, टॅक्सी व मोठ्या बस यांचा विमा उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. विमा कंपन्या त्यांच्या अपघात विम्याचे हप्ते वेगवेगळे घेत असले तरी अपघातांचा व त्यानंतर मागणी होत असलेल्या विम्याच्या प्रकरणांचा एकत्रित विचार करतात. वर्षाला सर्व वाहनांचे एकूण अपघात किती झाले, यावरून ते विम्याचा वार्षिक हप्ता निश्चित करतात. प्रत्येक कंपनीची हीच पद्धत आहे.

प्रत्येक विमा कंपनीच्या खातेदारांच्या एकूण वार्षिक अपघातांच्या संख्येत रिक्षांच्या अपघातांचे प्रमाण एकदम कमी आहे. प्रवासी बसचे अपघात सर्वात जास्त होतात. त्यात भरपाईही जास्त द्यावी लागते. विमा कंपन्या प्रवासी वाहनांच्या अपघातांचा एकत्रित विचार करण्यामुळे अपघातांची संख्या कमी असूनही रिक्षाच्या अपघात विम्याच्या वार्षिक हप्त्यात दर वर्षी वाढ होते.

भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये विमा कंपन्यांनी असा एकत्रित विचार न करता वाहननिहाय विचार करावा व त्यावरून विम्याचा वार्षिक हप्ता ठरवावा, असा आदेश काढला आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यात विमा कंपन्यांचा आर्थिक फायदा होतो मात्र सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रकारात तळाशी असलेल्या रिक्षा व्यावसायिकांचे मात्र नुकसान होत आहे.

आम आदमी रिक्षा संघटनेने प्राधिकरणाच्या हैद्राबाद येथील मुख्यालयाकडे याबाबत दाद मागितली आहे. मात्र, प्राधिकरण फक्त त्या आदेशाकडे बोट दाखवते, त्याचे पालन न करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. अन्य प्रवासी वाहनांच्या तुलनेत उत्पन्न तसेच क्षमता या सर्वच बाबतीत रिक्षा व्यावसायिक कमी आहेत, विमा कंपन्यांच्या या प्राधिकरणाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रकाराचा गेली अनेक वर्षे त्यांना त्रास होतो आहे. आदेशाचे पालन झाले तर रिक्षा व्यावसायिकांना सध्या असणाऱ्या विम्याच्या वार्षिक हप्त्यात घट होईल असे संघटनेचे म्हणणे आहे.