शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

अकरावीचे वर्ग ९ आॅगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:48 IST

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे.

पुणे : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही त्यांचे काय? त्यांचा अभ्यासक्रम मागे पडून शैक्षणिक नुकसान झाले याची जबाबदारी कुणाची? अशी विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे.तिसºया फेरीनंतरही अनेकांना अद्याप महाविद्यालय मिळू न शकल्याने विद्यार्थी व पालक चांगलेच धास्तावले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र, समितीने लगेच महाविद्यालय सुरू करण्याचा आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे ११ वीचे ७५ टक्के प्रवेश झाले आहेत, त्यांचे सत्र येत्या ९ आॅगस्टपासून सुरू करण्याचा आदेश समितीने दिला आहे.सध्या चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पसंतिक्रम बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संधी देण्यात आली होती. केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६०, तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहेत. तर, ३० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.