शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहर, ग्रामीण भागाला पाणी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी व ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यायचा आहे. पाण्याचा गैरवापर थांबवा. जलसंपदा विभाग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरी व ग्रामीण भागातील जनतेला न्याय द्यायचा आहे. पाण्याचा गैरवापर थांबवा. जलसंपदा विभाग व महापालिका यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अशा सूचना कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या तसेच तसेच उन्हाळ्यात कोणालाही पाणी कमी पडणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

कालवा सल्लागार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतीत विधानभवन येथे सोमवारी पार पडली. या बैठकीला खासदार गिरीश बापट, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार मुक्ता टिळक,माधुरी मिसाळ, यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे,सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील आदि अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा विभाग व महापालिका आमनेसामने उभे राहिल्याचे चित्र दिसून आले. यावेळी शहरी भागाला पाण्याचा कोटा वाढवून मिळावा तर ग्रामीण भागातूनही शेतीला जादा पाणी मिळावे, अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे पार पडलेल्या बैठकीत केवळ मध्यममार्ग काढण्यात आला. तसेच पाणीबाटपबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

कालवा सल्लागार समितीची शुक्रवारी देखील बैठक झाली. परंतु, त्यामध्ये देखील पाणी वाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. यात सुध्दा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पाणीवापर जैसे थे राहणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान पुणे महापालिकेचे पाणी गळतीचे प्रमाण 30 ते 35 टक्के आहे. त्यामुळे प्रामुख्याने गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा. तसेच महापालिकेने स्वत: पाण्याचे ऑडिट करा, या शिवाय पाण्याची चोरी होत आहे. यावर नियंत्रण मिळवा. त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्या, अशा सूचना पवार यांनी दिल्या. याबरोबरच उन्हाळ्यात पाण्याची दोन आर्वतने मिळाली पाहिजेत, अशी मागणी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी केली.

------