शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

... हे शहर होते चक्क आठवडाभर एसटी बससेवेपासून वंचित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:29 IST

जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती.

ठळक मुद्देएसटी बससेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना

वालचंदनगर : पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांचा २००१ मध्ये खुन झाला होता. या खुनातील तीन आरोपींना हायकोर्टाने २००६ मध्ये इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, हे तीनही आरोपी वालचंदनगरमध्ये राजरोसपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींचा जामीन हायकोर्टाने रद्द करावा म्हणून वालचंदनगर बंद ठेवण्यात आले असताना अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केली. या कारणाने बारामती आगारातील संबंधित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांना सहन करावा लागला. याप्रकरणी आगार प्रमुखांकडे चौकशी केली असता शासकीय महामंडळातील एस.टी बसवर कोणत्याही प्रकारचे कारण नसताना तोडफोड होत असल्यामुळे नुकसान होण्याऐवजी एसटी बस गाड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी (२५मे) दुपारी दोन वाजता पुन्हा प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्यात आल्याचे बारामती आगारातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :IndapurइंदापूरTravelप्रवासBaramatiबारामती