शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली

By admin | Updated: September 23, 2014 06:57 IST

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत. एकीकडे ‘बेस्ट सिटी’चे पारितोषिक पटकाविणाऱ्या शहराची ओळख आता गुन्हेगारीचे शहर अशी होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा लोकांची आहे. पोलिसांनी या टोळ्यांना आणि त्यांना रसद पुरविणाऱ्यांना तथाकथित पुढाऱ्यांना हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.टोळ्यांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये गुंतलेले तरुण खून, मारमाऱ्या, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे करतात आणि या टोळीच्या नावाखाली वाहनचोरीपासून सोनसाखळ्या हिसकावण्यापर्यंतचे गुन्हे करण्यापर्यंतची ताकत इतर भुरट्या चोरट्यांची वाढली आहे.किरकोळ कारणावरुन टोळ्यांचे प्रमुख समाजात दहशत निर्माण करीत आहेत. काही महिन्यांपासून आकुर्डीत टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात भडकले आहे. या ठिकाणी तीन टोळ्या असून, त्यांचे विविध कारणांवरून एकमेकांशी वैर आहे. तीनही टोळ्या स्थानिक असून, त्यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे. आकुर्डी गावठाण येथे १० सप्टेंबरला सराईत गुन्हेगारांनी गोळीबार करीत दहशत माजविली. हा गोळीबार सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुन्हेगारांनी केला. फरार आठ आरोपींपैकी पाच जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले, तरी या टोळीचा म्होरक्या सोन्या काळभोर व त्याचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. गोळीबार आणि त्यानंतर माजविलेली दहशत यामुळे आकुर्डी व परिसरात नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अशातच रविवारी रात्री पुन्हा आकुर्डीत टोळीयुद्ध भडकले. गौरव साठे या सराईत गुन्हेगारावर आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. साठे ज्या टोळीशी जोडलेला आहे, त्यांच्या विरोधी टोळीनेच हल्ला केल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या अशा टोळीयुद्धामुळे रहिवासी दबावाखाली आहेत.भांडणाचा वचपा काढण्यासाठी नऊ ते दहा जणांनी पिस्तूल व कोयत्यासह इमारतीत शिरून दहशत माजविली. ही घटना २१ एप्रिलला पिंपरीतील मिलिंदनगर येथील विशाखा इमारतीत घडली होती. यातील आरोपीही एका टोळीशी संबंधित होते. (प्रतिनिधी)