शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:37 IST

स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा नागरिकांची बैठक घेण्यात येईल. व्यापारी संघटनेने याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्याचे जाहीर केले आहे.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.स्मार्ट सिटी योजनेतच नागरिकांचा सहभाग गृहीत धरण्यात आला आहे. एखाद्या समस्येवर नागरिकांच्या प्रयत्नातून मात करणारी उपाययोजना व नंतर तिची अंमलबजावणी अशा विचारांना अनुसरूनच या दरमहा बैठका घेण्यात येतील. व्यापारी संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहर सल्लागार मंडळाची बैठक घेण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे तेव्हा उपस्थित होते, अशी माहिती जगताप यांनी दिली.औंध प्रभाग कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेही यात सहभागी होऊ शकतील. औंध प्रभाग कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत नागरिकांनी या कल्पनेचे स्वागत केले असून सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे.- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी

टॅग्स :Puneपुणे