शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्मार्ट सिटीत नागरिकांचा सहभाग, दरमहा बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:37 IST

स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा नागरिकांची बैठक घेण्यात येईल. व्यापारी संघटनेने याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्याचे जाहीर केले आहे.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.स्मार्ट सिटी योजनेतच नागरिकांचा सहभाग गृहीत धरण्यात आला आहे. एखाद्या समस्येवर नागरिकांच्या प्रयत्नातून मात करणारी उपाययोजना व नंतर तिची अंमलबजावणी अशा विचारांना अनुसरूनच या दरमहा बैठका घेण्यात येतील. व्यापारी संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहर सल्लागार मंडळाची बैठक घेण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे तेव्हा उपस्थित होते, अशी माहिती जगताप यांनी दिली.औंध प्रभाग कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेही यात सहभागी होऊ शकतील. औंध प्रभाग कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत नागरिकांनी या कल्पनेचे स्वागत केले असून सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे.- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी

टॅग्स :Puneपुणे