शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांमार्फत प्रक्रिया राबविण्यासाठी काढले परिपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:10 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब व गट-क तसेच गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने खासगी कंपनीच्या मोफत भरावीत, ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब व गट-क तसेच गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने खासगी कंपनीच्या मोफत भरावीत, अशा स्वरूपाचे परिपत्रक २२ एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

एमपीएससीच्या कक्षेबाहरील सरळसेवा पद भरती प्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक निवड समित्या व राज्यस्तरीय निवड समित्यांनी सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाने पॅनेलवरील नियुक्त केलेल्या कंपनीकडून कार्यवाही करावी. उच्चस्तर समितीने सुधारित पद्धती राबविण्यासाठी पॅनेलवरील पाच कंपनींना पाच वर्षासाठी मान्यता दिली आहे.

सरकारला स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्याची इच्छा नाही. मागील सरकारच्या काळातील महापोर्टल बंद करून सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत अथवा पारदर्शक पद्धतीने राबविल्या जातील, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, या सरकारने केवळ महापोर्टल बंद न करता निवड समित्या, निवड मंडळ अशी गोंडस नावे ठेऊन मागील सरकारचीच री ओढली आहे.

परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यातच रस

खासगी कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्यानंतर काय गोंधळ होतो. हे आरोग्य विभागाच्या गट-क पदाच्या भारती प्रक्रियेचे ताजे उदाहरण आहे. यावरून विधानसभेत प्रश्न उठवला गेला. मात्र यावर ठोस कारवाई न करता परीक्षा प्रक्रिया पुढे रेटली. यावरून धडा घेऊन महाविकास आघाडी सरकारला आता तरी शहाणपण येईल, असे वाटले होते. मात्र, एमपीएससीची तयारी असताना देखील परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यात या सरकारला रस आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मागणी करूनही दुर्लक्ष केले, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

जिवंतपणीच्या मरण यातना नकोत

सरकारला जर परीक्षा पारदर्शकपणे परीक्षा घ्यायच्या नसतील तर, ज्यांना सेवेत घ्यायचे आहे, त्यांना थेट घ्यावे. गोरगरिबांच्या मुलांना यामुळे तरी कोणती खोटी अशा लागणार नाही. वर्ष वाया जाणार नाहीत. पण खोटी अशा लावून जिवंतपणीच्या मरण यातना नकोत. आईवडील डोळे लावून बसले आहेत की, कधी मुलाला नोकरी लागेल, आणि गरिबीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडेल. मात्र कोणत्याही सरकारला जनतेचे पडलेले नाही. केवळ मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचे लोणी खाण्यातच रस आहे, अशी भावना एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.