शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

खासगी कंपन्यांमार्फत प्रक्रिया राबविण्यासाठी काढले परिपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:10 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब व गट-क तसेच गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने खासगी कंपनीच्या मोफत भरावीत, ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब व गट-क तसेच गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने खासगी कंपनीच्या मोफत भरावीत, अशा स्वरूपाचे परिपत्रक २२ एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

एमपीएससीच्या कक्षेबाहरील सरळसेवा पद भरती प्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक निवड समित्या व राज्यस्तरीय निवड समित्यांनी सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाने पॅनेलवरील नियुक्त केलेल्या कंपनीकडून कार्यवाही करावी. उच्चस्तर समितीने सुधारित पद्धती राबविण्यासाठी पॅनेलवरील पाच कंपनींना पाच वर्षासाठी मान्यता दिली आहे.

सरकारला स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्याची इच्छा नाही. मागील सरकारच्या काळातील महापोर्टल बंद करून सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत अथवा पारदर्शक पद्धतीने राबविल्या जातील, अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, या सरकारने केवळ महापोर्टल बंद न करता निवड समित्या, निवड मंडळ अशी गोंडस नावे ठेऊन मागील सरकारचीच री ओढली आहे.

परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यातच रस

खासगी कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्यानंतर काय गोंधळ होतो. हे आरोग्य विभागाच्या गट-क पदाच्या भारती प्रक्रियेचे ताजे उदाहरण आहे. यावरून विधानसभेत प्रश्न उठवला गेला. मात्र यावर ठोस कारवाई न करता परीक्षा प्रक्रिया पुढे रेटली. यावरून धडा घेऊन महाविकास आघाडी सरकारला आता तरी शहाणपण येईल, असे वाटले होते. मात्र, एमपीएससीची तयारी असताना देखील परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यात या सरकारला रस आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मागणी करूनही दुर्लक्ष केले, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

चौकट

जिवंतपणीच्या मरण यातना नकोत

सरकारला जर परीक्षा पारदर्शकपणे परीक्षा घ्यायच्या नसतील तर, ज्यांना सेवेत घ्यायचे आहे, त्यांना थेट घ्यावे. गोरगरिबांच्या मुलांना यामुळे तरी कोणती खोटी अशा लागणार नाही. वर्ष वाया जाणार नाहीत. पण खोटी अशा लावून जिवंतपणीच्या मरण यातना नकोत. आईवडील डोळे लावून बसले आहेत की, कधी मुलाला नोकरी लागेल, आणि गरिबीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडेल. मात्र कोणत्याही सरकारला जनतेचे पडलेले नाही. केवळ मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचे लोणी खाण्यातच रस आहे, अशी भावना एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.