शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन; औरंगाबाद, नागपूर, जळगावचे तापमानही आले १० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:05 IST

काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

पुणे : नाताळ गुलाबी थंडी घेऊन आल्याने राज्याला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे.राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान१० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे़ उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते़ त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंतकमी झाली आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानमुंबई २०़५, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १७़७, रत्नागिरी १८़४, पणजी १८़८, डहाणू १७, भिरा १४़५, पुणे १०़६, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १०़२, नाशिक ९़५, सांगली १३़७, सातारा ११़४, सोलापूर १३़१, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १०़४, परभणी १०़६, नांदेड १२, अकोला १०़४, अमरावती १२़६, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी ९़६, चंद्रपूर १३़६, गोंदिया ९़८, नागपूर ९़८, वर्धा १०़९, यवतमाळ १३़(अंश सेल्सिअसमध्ये)

कोल्हापुरात थंडीचा बळीरंकाळा तलाव परिसरात तांबट कमानीजवळ ४५ वर्षांच्या फिरस्त्या पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांना आढळला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला असता थंडीत गारठून मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापुरात थंडीचा हा पहिला बळी आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून हा फिरस्ता भटकंती करत होता. काही दिवसांपासून एका सिमेंटच्या पाईपमध्ये तो दिवस-रात्र उपाशीपोटी झोपून असायचा. पांघरूण नसल्याने थंडीने हुडहुडत तो झोपलेला असायचा. त्याचा मृत्यू हा थंडीमध्ये गारठून झाल्याचे निदान सीपीआरमधील डॉक्टरांनी केले आहे.