शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन; औरंगाबाद, नागपूर, जळगावचे तापमानही आले १० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:05 IST

काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

पुणे : नाताळ गुलाबी थंडी घेऊन आल्याने राज्याला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे.राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान१० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे़ उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते़ त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंतकमी झाली आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानमुंबई २०़५, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १७़७, रत्नागिरी १८़४, पणजी १८़८, डहाणू १७, भिरा १४़५, पुणे १०़६, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १०़२, नाशिक ९़५, सांगली १३़७, सातारा ११़४, सोलापूर १३़१, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १०़४, परभणी १०़६, नांदेड १२, अकोला १०़४, अमरावती १२़६, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी ९़६, चंद्रपूर १३़६, गोंदिया ९़८, नागपूर ९़८, वर्धा १०़९, यवतमाळ १३़(अंश सेल्सिअसमध्ये)

कोल्हापुरात थंडीचा बळीरंकाळा तलाव परिसरात तांबट कमानीजवळ ४५ वर्षांच्या फिरस्त्या पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांना आढळला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला असता थंडीत गारठून मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापुरात थंडीचा हा पहिला बळी आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून हा फिरस्ता भटकंती करत होता. काही दिवसांपासून एका सिमेंटच्या पाईपमध्ये तो दिवस-रात्र उपाशीपोटी झोपून असायचा. पांघरूण नसल्याने थंडीने हुडहुडत तो झोपलेला असायचा. त्याचा मृत्यू हा थंडीमध्ये गारठून झाल्याचे निदान सीपीआरमधील डॉक्टरांनी केले आहे.