शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन; औरंगाबाद, नागपूर, जळगावचे तापमानही आले १० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:05 IST

काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

पुणे : नाताळ गुलाबी थंडी घेऊन आल्याने राज्याला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे.राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान१० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे़ उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते़ त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे़ काश्मीर खोºयात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंतकमी झाली आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानमुंबई २०़५, सांताक्रुझ १६़६, अलिबाग १७़७, रत्नागिरी १८़४, पणजी १८़८, डहाणू १७, भिरा १४़५, पुणे १०़६, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १०़२, नाशिक ९़५, सांगली १३़७, सातारा ११़४, सोलापूर १३़१, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १०़४, परभणी १०़६, नांदेड १२, अकोला १०़४, अमरावती १२़६, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी ९़६, चंद्रपूर १३़६, गोंदिया ९़८, नागपूर ९़८, वर्धा १०़९, यवतमाळ १३़(अंश सेल्सिअसमध्ये)

कोल्हापुरात थंडीचा बळीरंकाळा तलाव परिसरात तांबट कमानीजवळ ४५ वर्षांच्या फिरस्त्या पुरुषाचा मृतदेह रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांना आढळला. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला असता थंडीत गारठून मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापुरात थंडीचा हा पहिला बळी आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून हा फिरस्ता भटकंती करत होता. काही दिवसांपासून एका सिमेंटच्या पाईपमध्ये तो दिवस-रात्र उपाशीपोटी झोपून असायचा. पांघरूण नसल्याने थंडीने हुडहुडत तो झोपलेला असायचा. त्याचा मृत्यू हा थंडीमध्ये गारठून झाल्याचे निदान सीपीआरमधील डॉक्टरांनी केले आहे.