शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

टाळेबंदी आणि ‘शाळा बंद’मुळे बालमजुरीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा वेचणे, कच-याचे वर्गीकरण करणे, भंगार गोळा करणे या कामावर मुलांना जायला लागत आहे. शहर व ग्रामीण परिसरात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. या बालमजुरांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असल्याचा सूर बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात उमटला.

या कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद आणि ॲड. आनंद महाजन, कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेचे आदित्य व्यास, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधवर, न्यास संस्थेचे रोहित यालीगार आणि ‘डोअर स्टेप स्कूल’चे हरीश फडके यांनी मार्गदर्शन केले. शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध सामाजिक संस्थेतील शंभर सामाजिक कार्यकर्ते कार्यशाळेत सहभागी झाले होते.

ज्ञानेश्वर जाधवर यांनी ऊसतोड कामगाराच्या नोंदणीच होत नाही. परिणामत: त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत कोणताही पाठपुरावा केला जात नसल्याचे सांगितले. रोहित यालीगार यांनी शहरी वस्त्यांमधील मुले शिक्षणाच्या सोई न मिळाल्याने बालमजुरीकडे असे वळत असल्याचे सांगितले. हरीश फडके यांनी वीटभट्टी व बांधकाम क्षेत्रामध्ये कशा रीतीने बालकांकडून अप्रत्यक्षरीत्या मजुरी करून घेतली जाते याबाबत विवेचन केले.

या चर्चासत्रातून आलेल्या मुद्द्यांच्या आधारे संबधित शासकीय यंत्रणा सक्रीय करण्यासाठी बालहक्क कृती समितीकडून पाठपुरावा केला जाणार आहे. बालहक्क कृती समितीचे समन्वयक सुशांत आशा यांनी शासनाने बालमजुरीच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी बनविलेल्या पेन्सिल पोर्टलची माहिती दिली. कुठेही बालमजूर दिसल्यास www.pencil.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.