शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदी आणि ‘शाळा बंद’मुळे बालमजुरीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा वेचणे, कच-याचे वर्गीकरण करणे, भंगार गोळा करणे या कामावर मुलांना जायला लागत आहे. शहर व ग्रामीण परिसरात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. या बालमजुरांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असल्याचा सूर बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात उमटला.

या कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद आणि ॲड. आनंद महाजन, कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेचे आदित्य व्यास, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधवर, न्यास संस्थेचे रोहित यालीगार आणि ‘डोअर स्टेप स्कूल’चे हरीश फडके यांनी मार्गदर्शन केले. शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध सामाजिक संस्थेतील शंभर सामाजिक कार्यकर्ते कार्यशाळेत सहभागी झाले होते.

ज्ञानेश्वर जाधवर यांनी ऊसतोड कामगाराच्या नोंदणीच होत नाही. परिणामत: त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत कोणताही पाठपुरावा केला जात नसल्याचे सांगितले. रोहित यालीगार यांनी शहरी वस्त्यांमधील मुले शिक्षणाच्या सोई न मिळाल्याने बालमजुरीकडे असे वळत असल्याचे सांगितले. हरीश फडके यांनी वीटभट्टी व बांधकाम क्षेत्रामध्ये कशा रीतीने बालकांकडून अप्रत्यक्षरीत्या मजुरी करून घेतली जाते याबाबत विवेचन केले.

या चर्चासत्रातून आलेल्या मुद्द्यांच्या आधारे संबधित शासकीय यंत्रणा सक्रीय करण्यासाठी बालहक्क कृती समितीकडून पाठपुरावा केला जाणार आहे. बालहक्क कृती समितीचे समन्वयक सुशांत आशा यांनी शासनाने बालमजुरीच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी बनविलेल्या पेन्सिल पोर्टलची माहिती दिली. कुठेही बालमजूर दिसल्यास www.pencil.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.