शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

टाळेबंदी आणि ‘शाळा बंद’मुळे बालमजुरीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, शाळा बंद आणि वस्तीपातळीवर सुरक्षित पाळणाघरे नसल्याने नाईलाजाने पालकांबरोबर कचरा वेचणे, कच-याचे वर्गीकरण करणे, भंगार गोळा करणे या कामावर मुलांना जायला लागत आहे. शहर व ग्रामीण परिसरात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. या बालमजुरांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची असल्याचा सूर बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात उमटला.

या कार्यशाळेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद आणि ॲड. आनंद महाजन, कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेचे आदित्य व्यास, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधवर, न्यास संस्थेचे रोहित यालीगार आणि ‘डोअर स्टेप स्कूल’चे हरीश फडके यांनी मार्गदर्शन केले. शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध सामाजिक संस्थेतील शंभर सामाजिक कार्यकर्ते कार्यशाळेत सहभागी झाले होते.

ज्ञानेश्वर जाधवर यांनी ऊसतोड कामगाराच्या नोंदणीच होत नाही. परिणामत: त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत कोणताही पाठपुरावा केला जात नसल्याचे सांगितले. रोहित यालीगार यांनी शहरी वस्त्यांमधील मुले शिक्षणाच्या सोई न मिळाल्याने बालमजुरीकडे असे वळत असल्याचे सांगितले. हरीश फडके यांनी वीटभट्टी व बांधकाम क्षेत्रामध्ये कशा रीतीने बालकांकडून अप्रत्यक्षरीत्या मजुरी करून घेतली जाते याबाबत विवेचन केले.

या चर्चासत्रातून आलेल्या मुद्द्यांच्या आधारे संबधित शासकीय यंत्रणा सक्रीय करण्यासाठी बालहक्क कृती समितीकडून पाठपुरावा केला जाणार आहे. बालहक्क कृती समितीचे समन्वयक सुशांत आशा यांनी शासनाने बालमजुरीच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी बनविलेल्या पेन्सिल पोर्टलची माहिती दिली. कुठेही बालमजूर दिसल्यास www.pencil.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.