शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पगार देणे शक्य नसतानाही ‘छत्रपती’ची १८० कामगारांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ...

बेलवाडी येथील शेतकरी तानाजी हरिभाऊ यादव यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट सध्या सभासदांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. यादव यांनी कारखान्याच्या कारभारावर आक्षेप घेत काही बाबी उघड केल्या आहेत. राज्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पहिला कारखाना आहे, जेथे सेवा निवृत्तीनंतर निधन झालेल्या कार्यकारी संचालकाच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियम डावलून नोकरी दिली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. ‘सहकार’ शेतकरीवर्गाला सुखाने जगू देणार नाही याची हमी देणारा ‘छत्रपती’ राज्यातील एकमेव कारखाना असल्याचा टोला लगावत त्यांनी सर्व संचालक मंडळाला दंडवत घातले आहे.

नेत्यांनी सभासदाना जो शब्द दिला होता. त्या प्रमाणे ते वागले असल्याचे यादव यांनी या पोस्टमध्ये उपरोधिकपणे नमूद केले आहे. मागील वर्षी आपल्या परिसरातील इतर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना २८०० ते ३००० पर्यंत सरासरी दर दिला आहे. मात्र, आपल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखानाच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाला २२५० रुपये इतका भरघोस दर मिळाला. कारखान्यात केलेल्या या कारभारामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यामान संचालक मंडळाला विशेष आधिकार वापरुन आणखी ५ वर्षे मुदत वाढ द्यावी, मोदी सरकारने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदासाठी आणखी एक कायदा करावा, असा उपरोधिक टोलादेखील यादव यांनी संचालक मंडळाला लगावला आहे.