शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आईसह प्रियकराकडूनही चैतन्यला मारहाण

By admin | Updated: August 8, 2015 00:51 IST

चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

येरवडा : चैतन्यच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. आई राखी व तिचा प्रियकर सुमित मोरे यांनी केलेल्या मारहाणीमुळे चैतन्यचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. राखी व सुमित यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण झाल्यापासून चैतन्यला ससूनमध्ये नेईपर्यंत त्याच्या शेजाऱ्यांना या प्रकरणाची अजिबातच कल्पना नव्हती. बुधवारी मध्यरात्रीनंतर ससूनमध्ये नेल्यानंतर राखीने इमारतीतील शेजारील महिलेला दूरध्वनीवरून चैतन्यच्या निधनाची बातमी कळवली होती. चैतन्यच्या आकस्मिक मृत्यूमुुळे तो राहत असलेल्या इमारतीतील मुले, महिला व नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. येथील महिला व लहान मुले अद्यापही यातून सावरलेले नाहीत. त्याच्या खुनामध्ये आई राखी बालपांडेचाच सहभाग असल्याचे पाहून सर्वजण संताप व आश्चर्य व्यक्त करीत आहेत.चैतन्य हा दीड-दोन वर्षांपासून आई, आजी व मावशीसमवेत टिंंगरेनगरमधील एस. बी. एनक्लेव इमारतीतील पहिल्या मजल्यावरील क्रमांक दोनच्या सदनिकेत राहत होता. चैतन्यला आजार असल्याने व्यवस्थित चालता येत नव्हते. तो दोन्ही पायांच्या टाचा वर करून बोटांवर चालत असे. राखीने तिची बहीण व आईसमोरही चैतन्यला अनेक वेळा मारहाण केली होती. या दोघींनीही तिला समजून सांगूनही राखीच्या वागण्यात फरक पडत नव्हता. राखीच्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिची बहीण ठाण्यातील पतीच्या घरी गेली. त्यानंतर अलीकडील काळात तर राखी चैतन्यला नीट जेवणही देत नव्हती. यावरून राखी व तिच्या आईमध्ये अनेक वेळा वादावादी होत असे. मात्र, एके दिवशी राखीने आईलाच मारहाण करून घराबाहेर काढले. त्यामुळे तिची आई आठवडाभरापूर्वीच नागपूरला राहायला गेल्याचे या इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.राखी चैतन्यचा नीट सांभाळ करीत नसल्याने राखीची आई व बहिणीला त्याची काळजी वाटत होती. त्या दोघीही इमारतीतील महिलांशी संपर्कात होत्या. राखी चैतन्यला दिवसभर घरात कोंडून कामावर जात होती. राखी घरात नसताना तरी त्याला काहीतरी खायला द्या व त्याच्यावर लक्ष ठेवत जा, असे या दोघीही या इमारतीतील शेजाऱ्यांना नेहमी विनंती करीत असत. मात्र, राखीने सदनिकेच्या सर्व दरवाजांना कुलूप लावून चैतन्यला आतमध्ये कोंडण्यास सुरुवात केल्याने शेजाऱ्यांनाही त्याला काहीही मदत करता येत नव्हती. ही बाब त्यांनी राखीच्या आईलाही कळवली होती. चैतन्यला त्याच्या वडिलांकडे पाठवा अथवा ही बाब पोलिसांना कळवा, असेही शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, कुणी काही करण्याच्या आधीच चैतन्यवर काळाने घाला घातला. दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करत राखी हिच्यासह सुमीत मोरे यालाही अटक केली आहे. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिला न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिचा प्रियकर सुमीत मोरे यालाही अटक करण्यात आली आहे.