शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रकार : पाण्याचे नमुने तपासून कारवाई करण्याची मागणी

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी खासगी टँकरच्या साह्याने रात्रीच्या वेळेस आजवर अनेक डोंगर भागात टाकले जात होते. मात्र आता हे पाणी ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे कुरकुंभ परिसरात आधीच थोड्याफार प्रमाणात राहिलेली शेती आता पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाºया कारखानदारांना शोधण्याचे आव्हान प्रदूषण मंडळ व तत्सम विभागापुढे उभे ठाकले आहे.

कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात अनेक छोटे उद्योग अस्तित्वात असून, यामधील अनेक उद्योगातून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी कंपनी मालक आजपर्यंत मनमानी पद्धतीने पाणी रात्रीच्या वेळेस कंपनीच्या खाजगी जागेत सोडत असल्याचे आजवर उघड झाले आहे. मात्र आता त्या जागाही पाणी सोडण्याच्या उपयोगासकमी पडत असून, ग्रामस्थांच्या जागरुकीने पाण्याची विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.त्यामुळे खासगीत टँकरला भाडेतत्त्वावर घेऊन हे पाणी दौंड-बारामती रस्त्याच्या दरम्यानअसणाºया वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. याबाबत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कुठलीच कारवाई आजतागायत करण्यात आली नाही.रासायनिक प्रकल्पातील अनेक कंपनी समूहाच्या माध्यमातून सांडपाणी सामूहिक प्रक्रियाकेंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या पाण्यावर ठरावीक मापदंडावरप्रक्रिया केली जाते मात्र ज्याकंपनीचे सांडपाणी अतिशय घातक आहे, त्यांना यामध्ये प्रवेशनाकारला जातो, त्यामुळे अशाकंपन्या बºयाच वेळा पाणीउघड्यावर सोडत असल्याच्यातक्रारी येत असतात. अनेक वेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्षात भेट देऊन वरील सर्व प्रकार पाहिलेला असून आर्थिक संबंध जपण्याच्या प्रचलित पद्धतीने कुठलीच कारवाई केली जात नाही. मात्र याचा प्रत्यक्ष त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे.महामार्गावर टँकर केला जातो रिकामा...कुरकुंभ येथून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, बारामती, नगरला जोडणारा मार्ग, तसेच दौंड तालुक्यातील अन्य औद्योगिक वसाहती, तसेच बारामती येथे असणारे उद्योग त्यामुळे परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी रस्त्यावर एखादा टँकर थांबला असला तरी त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अनेक वेळा बिघाड झाल्याच्या नावाखाली टँकर उभा करून गुपचूप सांडपाणी सोडले जाते. मात्र यावर लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ अशा मुजोरपणे प्रदूषण करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Puneपुणे