शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रकार : पाण्याचे नमुने तपासून कारवाई करण्याची मागणी

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी खासगी टँकरच्या साह्याने रात्रीच्या वेळेस आजवर अनेक डोंगर भागात टाकले जात होते. मात्र आता हे पाणी ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे कुरकुंभ परिसरात आधीच थोड्याफार प्रमाणात राहिलेली शेती आता पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाºया कारखानदारांना शोधण्याचे आव्हान प्रदूषण मंडळ व तत्सम विभागापुढे उभे ठाकले आहे.

कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात अनेक छोटे उद्योग अस्तित्वात असून, यामधील अनेक उद्योगातून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी कंपनी मालक आजपर्यंत मनमानी पद्धतीने पाणी रात्रीच्या वेळेस कंपनीच्या खाजगी जागेत सोडत असल्याचे आजवर उघड झाले आहे. मात्र आता त्या जागाही पाणी सोडण्याच्या उपयोगासकमी पडत असून, ग्रामस्थांच्या जागरुकीने पाण्याची विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.त्यामुळे खासगीत टँकरला भाडेतत्त्वावर घेऊन हे पाणी दौंड-बारामती रस्त्याच्या दरम्यानअसणाºया वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. याबाबत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कुठलीच कारवाई आजतागायत करण्यात आली नाही.रासायनिक प्रकल्पातील अनेक कंपनी समूहाच्या माध्यमातून सांडपाणी सामूहिक प्रक्रियाकेंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या पाण्यावर ठरावीक मापदंडावरप्रक्रिया केली जाते मात्र ज्याकंपनीचे सांडपाणी अतिशय घातक आहे, त्यांना यामध्ये प्रवेशनाकारला जातो, त्यामुळे अशाकंपन्या बºयाच वेळा पाणीउघड्यावर सोडत असल्याच्यातक्रारी येत असतात. अनेक वेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्षात भेट देऊन वरील सर्व प्रकार पाहिलेला असून आर्थिक संबंध जपण्याच्या प्रचलित पद्धतीने कुठलीच कारवाई केली जात नाही. मात्र याचा प्रत्यक्ष त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे.महामार्गावर टँकर केला जातो रिकामा...कुरकुंभ येथून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, बारामती, नगरला जोडणारा मार्ग, तसेच दौंड तालुक्यातील अन्य औद्योगिक वसाहती, तसेच बारामती येथे असणारे उद्योग त्यामुळे परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी रस्त्यावर एखादा टँकर थांबला असला तरी त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अनेक वेळा बिघाड झाल्याच्या नावाखाली टँकर उभा करून गुपचूप सांडपाणी सोडले जाते. मात्र यावर लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ अशा मुजोरपणे प्रदूषण करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Puneपुणे