शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:09 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रकार : पाण्याचे नमुने तपासून कारवाई करण्याची मागणी

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी खासगी टँकरच्या साह्याने रात्रीच्या वेळेस आजवर अनेक डोंगर भागात टाकले जात होते. मात्र आता हे पाणी ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे कुरकुंभ परिसरात आधीच थोड्याफार प्रमाणात राहिलेली शेती आता पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाºया कारखानदारांना शोधण्याचे आव्हान प्रदूषण मंडळ व तत्सम विभागापुढे उभे ठाकले आहे.

कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात अनेक छोटे उद्योग अस्तित्वात असून, यामधील अनेक उद्योगातून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी कंपनी मालक आजपर्यंत मनमानी पद्धतीने पाणी रात्रीच्या वेळेस कंपनीच्या खाजगी जागेत सोडत असल्याचे आजवर उघड झाले आहे. मात्र आता त्या जागाही पाणी सोडण्याच्या उपयोगासकमी पडत असून, ग्रामस्थांच्या जागरुकीने पाण्याची विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.त्यामुळे खासगीत टँकरला भाडेतत्त्वावर घेऊन हे पाणी दौंड-बारामती रस्त्याच्या दरम्यानअसणाºया वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. याबाबत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कुठलीच कारवाई आजतागायत करण्यात आली नाही.रासायनिक प्रकल्पातील अनेक कंपनी समूहाच्या माध्यमातून सांडपाणी सामूहिक प्रक्रियाकेंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या पाण्यावर ठरावीक मापदंडावरप्रक्रिया केली जाते मात्र ज्याकंपनीचे सांडपाणी अतिशय घातक आहे, त्यांना यामध्ये प्रवेशनाकारला जातो, त्यामुळे अशाकंपन्या बºयाच वेळा पाणीउघड्यावर सोडत असल्याच्यातक्रारी येत असतात. अनेक वेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्षात भेट देऊन वरील सर्व प्रकार पाहिलेला असून आर्थिक संबंध जपण्याच्या प्रचलित पद्धतीने कुठलीच कारवाई केली जात नाही. मात्र याचा प्रत्यक्ष त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे.महामार्गावर टँकर केला जातो रिकामा...कुरकुंभ येथून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, बारामती, नगरला जोडणारा मार्ग, तसेच दौंड तालुक्यातील अन्य औद्योगिक वसाहती, तसेच बारामती येथे असणारे उद्योग त्यामुळे परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी रस्त्यावर एखादा टँकर थांबला असला तरी त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अनेक वेळा बिघाड झाल्याच्या नावाखाली टँकर उभा करून गुपचूप सांडपाणी सोडले जाते. मात्र यावर लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ अशा मुजोरपणे प्रदूषण करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Puneपुणे